विश्रांती घेऊन पडणारा पाऊस लागवडीसाठी लाभदायक : विश्वनाथ गावस, भेंडीचे उत्पन्न वाढवण्यावर शेतकऱयांचा भर
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या पंधरा दिवसापासून विश्रांती घेऊन पाऊस पडू लागलेला आहे. यामुळे शेतकऱयांसाठी तो चांगला ठरत असून विविध प्रकारच्या लागवडीवर भर देण्यासही उत्तम संधी आहे. विश्रांती घेऊन पाऊस पडत असला तरी जमिनीमध्ये ओलावा निर्माण झालेला आहे. शेतकऱयांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन वाळपई विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांनी केले आहे.
पावसाची संततधार सुरू झाल्यास शेतकऱयांना लागवड करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे क्षमतेपेक्षा जास्त पाऊस लागल्यास जमिनीमध्ये अनावश्यक पाणीसाठा होत असतो. याचे दुष्परिणाम लागवडीवर होऊ शकतात. सध्यातरी चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे. विश्रांती घेऊन पडणारा पाऊस हा शेतकऱयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, असे विश्वनाथ गावस यांनी स्पष्ट केलेले आहे.
डोंगराळ भागात काजू लागवड
सध्यातरी सत्तरी तालुक्मयातील काजू उत्पादकांनी काजू लागवडीला सुरुवात केलेली आहे. डोंगराळ भागात काजू लागवडीसाठी हा अत्यंत उपयुक्त असा वेळ आहे. विश्रांती घेऊन पाऊस पडत असल्याची संधी काजू उत्पादकांनी साधली असून काजू लागवडीकडे भर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात आले लागवडीचे प्रमाण वाढले
दरम्यान आंतरपिकाच्या माध्यमातून सध्या तरी आले लागवड ही अत्यंत उपयुक्त ठरत आहे. गेल्या काही वर्षापासून आल्याची लागवड सत्तरी तालुक्मयात जोमाने वाढत आहे. सध्यातरी विविध ठिकाणी आले लागवडीला सुरुवात करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे शेतकऱयांनी रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे भात लागवडीकडे दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात शेतकरी आले लागवडीकडे वळताना दिसत आहेत. यामुळे येणाऱया काळात सत्तरीत आले लागवडीची मोठी क्रांती निर्माण होऊ शकते असे एकूण चित्र पहावयास मिळत आहे.
भेंडी लागवडीला सुरुवात
त्याचप्रमाणे सध्या भेंडीच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. भेंडी अत्यंत किफायतशीर असून यातून चांगल्या प्रकारची आर्थिक प्राप्ती होत असते. गेल्यावषी प्रचंड प्रमाणात भेंडीची लागवड करण्यात आली होती. यंदाही अशाच प्रकारे भेंडीची लागवड होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आंबा लागवड करण्यात शेतकऱयांचा भर
सत्तरी तालुक्मयातील शेतकऱयांनी आंबा लागवडीवर भर दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. येणाऱया काळात आंबा लागवडीला चांगल्या प्रकारची संधी आहे. यामुळे आंबा उत्पादनातून चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो, असे शेतकऱयांचे म्हणणे आहे.