पावसाच्या उघडिपीचा फायदा घेत शेतकऱयांनी साधला हंगाम
वार्ताहर/नंदगड
तालुक्यातील भात हे प्रमुख पीक आहे. यावर्षी भाता पिकांसाठी पोषक हंगाम मिळाल्याने भातपीक उत्तम प्रकारे आले आहे. माळरानावरील जमिनीत तीन महिन्यात येणारे भात कापणीला आले होते. परंतु गेले काही दिवस परतीच्या पावसामुळे भातकापणी लांबली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून हवामानात बदल झाला असून कडक ऊन पडत असल्याने कापणीला आलेले भात पूर्णपणे वाळून तयार झाल्याने शेतकरी हंगाम साधून कापणीची लगबग सुरू आहे. शेतकरी पहाटेपासूनच भातकापणीच्या कामात व्यस्त आहेत.
ऊस तोडणी हंगाम
खानापूर तालुक्मयातील उसाला चांगला उतारा असल्याने कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने खानापूर तालुक्मयातील ऊस नेण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसापासून खानापूर तालुक्मयाच्या विविध गावात ऊस तोडणी सुरू आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतवाडीतील ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपला ऊस लवकरात लवकर कसा जाईल, यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे.