जिल्हाधिकाऱयांचा सत्कार : राज्यभरातून कौतुक
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवून बेळगाव जिह्याने देशात दहावा क्रमांक पटकाविला. याबद्दल दिल्ली येथे बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे जिल्हाधिकाऱयांचे संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. त्या प्रभावीपणे राबविणे महत्त्वाचे आहे. बेळगावच्या जिल्हाधिकाऱयांनी या योजना राबविण्यासाठी प्राधान्य दिले. आजादी से अंत्योदय तक या मोहिमेची 15 ऑगस्ट रोजी सांगता झाली. या मोहिमेमध्ये 27 राज्यांतील 75 जिह्यांनी सहभाग घेतला होता. बेळगाव जिह्यानेही त्यामध्ये सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये दहावा क्रमांक बेळगाव जिह्याने पटकाविला आहे.
केंद्र सरकारकडून 9 विभागांमध्ये 17 प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात आले. लाभार्थींना 84.85 टक्के योजना पोहोचविण्यात आल्याची नोंद झाली. आरोग्य, ग्राम विकास, महिला, कामगार विभाग अशा 9 विभागांमध्ये ही टक्केवारी झाली आहे. त्यामुळे बेळगावला दहावा क्रमांक देण्यात आला. या सत्कार समारंभामध्ये जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पंचायतीचे नियोजन निर्देशक रवी बंगारप्पण्णावर आदी उपस्थित होते.