विमानसेवेला मिळणार नवे पंख
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांच्या पिकासाठी सुरू केलेल्या कृषी उडान 2.0 या योजनेमध्ये बेळगावसह पाच विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे अवघ्या काही तासांमध्ये कृषी तसेच दुग्धजन्य पदार्थ बेळगावमधून इतर शहरांना नेणे सोयीचे ठरणार आहे. यामुळे बेळगाव, कोल्हापूर, सांगली परिसरातील शेतकऱयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विमानतळ प्राधिकरण याचबरोबर विविध संघटनांची बैठक शुक्रवारी दिल्ली येथे पार पडली. बैठकीत कृषी उडान 2.0 या योजनेमध्ये पाच विमानतळांचा समावेश करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. बेळगावसह भोपाळ, दरभंगा, जबलपूर व वझरसूगुड्डा या विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी उडान विमानतळांची संख्या आता 53 वर पोहोचली आहे. या बैठकीला नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे सेपेटरी राजीव बंसल, सेपेटरी उषा पाध्ये व इतर वरि÷ अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी बेळगाव विमानतळाचा समावेश उडान 3 अंतर्गत करण्यात आला होता. यामुळे अत्यंत माफक दरात बेळगावमधून इतर शहरांना प्रवास करता येतो. आता कृषी उडान या योजनेमध्येही बेळगाव विमानतळाचा समावेश झाला आहे. दीड वर्षापूर्वी बेळगाव विमानतळावरून कार्गो वाहतुकीला परवानगी मिळाली होती. त्यामुळे भविष्यात बेळगावमधून शेतीमाल, दूग्ध उत्पादने देशासह परदेशातही पाठविणे सोयीचे ठरणार आहे. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी कृषी उडान 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
कृषी उडान योजना म्हणजे काय?
शेतकऱयांना उत्पादन विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. बाजारातच मालाचा साठा होत राहिल्याने शेतीमाल खराब होतो. त्यामुळे शेतकऱयांचे कष्ट वाया जाऊन शेती तोटय़ाची ठरते. या नुकसानीपासून शेतकऱयांचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्यवेळी पिके बाजारात नेण्यासाठी पंतप्रधान कृषी उडान योजना सुरू करण्यात आली आहे.