कुद्रेमनी / प्रतिनिधी : परतीच्या पावसाने कुद्रेमनी परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाला इतका जोर होता की कुद्रेमानी फाट्याजवळ असलेल्या पुलावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे बेळगाव वेंगुला रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यामुळे बेळगावहून जाणाऱ्या वाहनांची आणि चंदगडहून बेळगावला येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाने सर्वांची दाणादाण उडवून सोडली. गुरुवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने अधिक जोर धरला. बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली होती.
Trending
- विरियातोंच्या विधानाचा पंतप्रधानांकडून समाचार
- पंतप्रधानांच्या सभेसाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर
- मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेच्या विचारांशी कटिबद्ध राहून प्रचार करणार – ऋत्विक सामंत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बेळगावात
- केदनूरजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
- नेहाच्या हत्येचे भाजपकडून राजकारण
- काँग्रेसने देशाची एकता-अखंडता राखली
- पोलीस अधिकाऱ्यासह 14 जणांवर गुन्हा