दिल्ली प्रतिनिधी :
पावसाळा लांबणीवर पडल्यामुळे सध्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. या उन्हाळ्यात आराम देण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला आराम मिळवून देणारी अनेक पेये आहेत. त्यापैकी 5 पेये आपण पाहू जी खूपच लोकप्रिय आहेत.
१) बाबरी बायोल
हे पेय तुम्हाला जम्मू-काश्मीर आणि उत्तरेकडील काही भागात मिळेल. जे तूळशीच्या बियांपासून बनवली जाते. या बियांना सब्जा बी असेही म्हणले जाते. हे सब्जा बी दूध, पाणी आणि नारळाच्या पाण्यात मिसळतात. हे खूप प्रसिद्ध पेय आहे.
२) सोल कढी
कोकणातील हे पेय महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पिले जाते. कोकणात माशाच्या जेवणासोबत हे दिले जाते. कोकम आगळ,मीठ, साखर, मिरची, आले किंवा लसूण एकत्र मिक्सर ला बारीक करून गाळून पाणी घालून बनवले जाते. उन्हाळ्यातील गरमी कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
3) चिंच आवळा
राजस्थानच्या उन्हात हे पेय वरदानापेक्षा कमी नाही. आंबट चिंचेमध्ये काळे मीठ, काही मसाले, पुदिना आणि थंड पाणी यांचे मिश्रण घालून बनवलेले हे पेय तुमच्या घशाला उष्णतेपासून आराम देते. ही देशी रेसिपी खूप आवडीने पिली जाते.
4) बेल सरबत
तुम्ही बेलचे सरबत सर्वत्र पिऊ शकता, परंतु हे बिहारचे वैशिष्ट्य मानले जाते. बेलचा गर थंड पाण्यात मिसळला जातो आणि काही निवडक मसाल्यांसोबत प्यायला दिला जातो. बेल मध्ये आढळणारे औषधी तत्त्वामुळे हे सरबत बिहारमध्ये पिले जाते.
5) थंडाई
उत्तर भारतात कुठेही जा. थंडाईचे अनेक चाहते तुम्हाला सापडतील. थंड दुधात बदाम, बडीशेप, आणि केशर मिसळून थंडाई तयार केली जाते, जी दगडांवर तासन् तास बारीक केली जाते.शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंडाई फायद्याची मानली जाते. या पेयामुळे शरीर मजबूत ही बनते.
6) चौरस
भारतातील अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये हे पेय मोठ्या आवडीने पिले जाते. भाताला आंबवून हे पेय तयार केला जाते. हे कौटुंबिक पेय म्हणून पिण्याची परंपरा आहे. खास प्रसंगी घरातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येवून हे पेय तयार करण्याची आणि पिण्याची परंपरा आहे.