पूर्वभागाबरोबरच सर्वत्र फैलाव, पशुपालकांनी खबरदारी घेणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्मयाच्या पूर्व भागात मर्यादित असलेला संसर्गजन्य लम्पिस्कीन तालुक्मयात सर्वत्र हात-पाय पसरवू लागला आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. जनावरांमध्ये या रोगाची तीव्रता वाढली असून तालुक्मयात आतापर्यंत 742 जनावरांना लागण झाली आहे. विशेषतः पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागातदेखील झपाटय़ाने या रोगाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे तात्काळ उपचार करून जनावरांना वाचविण्याचे आव्हान पशुसंगोपनसमोर आहे.
तालुक्मयात 1 लाख 78 हजार इतकी जनावरांची संख्या आहे. त्यापैकी 742 जनावरांना लागण झाली आहे. तर 158 जनावरे लम्पीमुक्त झाली आहे. उर्वरित लागण झालेल्या जनावरांवर उपचार सुरू आहेत. दीड महिन्यापूर्वी तालुक्मयात या रोगाचा शिरकाव झाला आहे. तेव्हापासून केवळ पूर्व भागातच या आजाराची जनावरे आढळून आली होती. मात्र, आता तालुक्मयातच या रोगाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंगोपनमार्फत लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत 17 हजार 498 गाय-बैलांना लम्पी प्रतिबंधक ‘गोटपॉक्स’ लस देण्यात आली आहे. यामुळे या रोगाची तीव्रता कमी होऊन जनावरे दगावण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. आतापर्यंत 29 जनावरे या रोगाची शिकार झाली आहेत. विशेषतः मरणाऱया जनावरांमध्ये गाय आणि बैलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दूधउत्पादक शेतकऱयांनादेखील मोठा फटका बसला आहे. शर्यतीचे बैलदेखील या रोगाने बळी पडत असल्याने शर्यतप्रेमींमध्ये देखील भीती निर्माण झाली आहे.
जनावर बरे होण्यासाठी तीन आठवडय़ांचा कालावधी
प्रामुख्याने हा आजार चावणाऱया माशा, डास, गोचिड आणि चिलटे यांच्यामार्फत फैलावतो. दरम्यान, लागण झालेले जनावर बरे होण्यासाठी तीन आठवडय़ांचा कालावधी लागतो. जनावरांना लागण झाल्यास अंगावर गाठी येऊन ते अशक्मत बनते. शिवाय दूधक्षमता देखील कमी होते. यासाठी शेतकऱयांनी खबरदारी म्हणून गोठा स्वच्छ करून धूर करावा, जनावरांवर जाळीचा वापर करावा. दरम्यान, लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
गावोगावी प्रतिबंधक लसीकरण मोहीम
रोग आटोक्मयात आणण्यासाठी गावोगावी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. बाधित जनावर असलेल्या गावापासून पाच किलोमीटर परिघाबाहेर ही लस दिली जात आहे. शिवाय ग्राम पंचायत आणि महानगरपालिकेला याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार 5 सप्टेंबरपासून खबरदारी म्हणून जनावरांचे आठवडी बाजार बंद ठेवले आहेत. शिवाय बैलगाडा शर्यतींवर देखील निर्बंध घातले आहेत. पशुपालक किंवा व्यापाऱयांनी जनावरे बाहेर काढू नयेत किंवा विक्रीसाठी बाजारात नेऊ नयेत, असे आवाहन केले आहे. रोग नियंत्रणासाठी तालुक्मयात 20 पशुवैद्यकीय अधिकारी प्रयत्नशील आहेत. शिवाय रॅपिड ऍक्शन पथकाची निर्मितीदेखील केली आहे.
वेळ न घालवता पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून उपचार करून घ्या
तालुक्मयात लम्पिस्कीनचा धोका वाढत आहे. मात्र, सर्व गावातून प्रतिबंधक ‘गोटपॉक्स’ लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे दिसताच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. शिवाय वेळ न घालवता पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून उपचार करून घ्यावेत.
– डॉ. आनंद पाटील (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)
खनगाव खुर्द, मुतगा, बसरीकट्टीत बैलांचा मृत्यू
लम्पिस्कीन आजाराने पूर्व भागात थैमान घातले असून दिवसेंदिवस जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. खनगाव खुर्द, मुतगा व बसरीकट्टी येथील प्रत्येकी एकेक अशा एकूण तीन बैलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लम्पिस्कीन आजाराने पूर्व भागामध्ये मृत्युमुखी पडणाऱया जनावरांची संख्या आता 29 वर पोहोचली आहे. खनगाव खुर्द येथील शेतकरी सिद्धाप्पा गणपती भडगावी यांच्या बैलाचा शुक्रवार दि. 23 रोजी मृत्यू झाला. तर मुतगा येथील शेतकरी नागाप्पा चौगुले यांच्या बैलाचा दि. 25 रोजी मृत्यू झाला आहे. तर बसरीकट्टी येथील खाचू कोंडुसकोप या शेतकऱयाचा बैल रविवारी लम्पिस्कीनमुळे मुत्युमुखी पडला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात अद्याप भीतीचे वातावरण कायम असून शेतकरी वर्ग अक्षरशः हतबल झाला आहे. या आजाराचा दुग्ध व्यवसायावरही परिणाम झाला आहे. दुग्ध व्यवसायावरच जास्तीत जास्त शेतकऱयांचा उदरनिर्वाह चालत असतो. लम्पिस्कीन आजाराच्या फैलावामुळे पूर्व भागातील अनेक जनावरांना लागण झाली आहे.