कोल्हापूर- २०१९ साली आलेल्या महापूरामुळे जिल्ह्यात पशुहानी प्रचंड झाली. एकूणच त्याला नागरिक जबाबदार असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या बेजाबदारीला धरून आता पशुसंवर्धन विभागाने महत्वाचे आदेश काढलेत. पूरबाधित गावांत जनावरे वाहून गेली. त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था नाही झाली, त्यासोबत त्याच्या संगोपनात हलगर्जी केल्याचे सिद्ध झाल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिलेत.
संभाव्य पूर्वपरिस्थीची लक्षात घेऊन जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज झाले आहे. आरोग्य यंत्रणा देखील तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यंदा पशुसंवर्धन विभाग देखील सज्ज झाला आहे. त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायतींना महत्वाचे आदेश देण्यात आलेत. गेल्या २०१९ च्या महापुरात प्रचंड पशुहानी झाली होती. यंदा मात्र ती होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने थेट इशारा देत नागरिकांना आवाहन केले आहे. संभाव्य पूर परिस्थितीत जनावरे पुरात वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पुरबाधित क्षेत्रापासून त्यांचे स्थलांतर करण्यात यावे. तसेच त्याठिकाणी चारा- पाण्याची व्यवस्था करावी. असे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहे. दरम्यान महापुरात एखादे जनावर वाहून गेल्यास, तसेच त्यांच्याबाबत दाखवलेला हलगर्जीपणा सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आलेत.