ऑनलाईन टीम/तरुण भारत
कॉँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. आज ती बुलढाणा (Buldhana) येथील खामगाव येथे आली होती. यावेळी संध्याकाळी राहुल गांधी यांची कोपरा सभा सुरू होती. या सभेत मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. मात्र, याच वेळी एका अज्ञात व्यक्तीने सभेत श्रद्धांजली वाहिली जात असताना फटाके फोडले. दरम्यान, ही बाब राहुल गांधी यांच्या लक्षात येताच त्यांनी फटाके वाजवणाऱ्याचा निषेध केला.
दरम्यान, काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज बुलढाण्यात असताना राहुल गांधी खामगाव तालुक्यातील भास्तान या गावी कॉर्नर सभा घेत होते. यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना अज्ञाताने स्टेज जवळच मोठ्या आवाजात फटाके फोडले. त्यामुळे राहुल गांधी यांनी सभेत भाषण अर्धवट सोडले. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यास सांगितले आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. यावेळी कोणीतरी ज्याने ही हरकत केली त्याला ताब्यात घ्यावे असे माईकवरून सांगितले.
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरून सरकारवर टीका केली. गांधी म्हणाले, तीन कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधानांची मानसिकता नव्हती. शेतकऱ्यांचा घामाचा पैसा काही उद्योगपतींच्या खिशात त्यांना द्यायचा होता. परंतु, शेतकऱ्यांच्या ताकदीने कृषी कायदे रद्द करावे लागले. या साठी ७३३ शेतकऱ्यांनी बळी या बदल्यात दिले आहेत. जर लवकर कायदे रद्द केले असते तर या शेतकऱ्यांचा जिव वाचला असता असे देखील गांधी म्हणाले. फटाके फोडण्यावरून गांधी म्हणाले, शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फटाके फोडून आनंद साजरा केला आणि आपली शेतकऱ्यांप्रति असंवेदनशीलता दाखविली, असे त्यांनी म्हटले.