वृत्तसंस्था /नवी दिल्ली
येथील तालाकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये 25 जुलैपासून खेळविल्या जाणाऱया पहिल्या खेलो इंडिया महिला समशेरबाजी लीग स्पर्धेसाठी भारताची महिला समशेरबाज भवानीदेवी सहभागी होणार आहे.
ही स्पर्धा तीन टप्प्यात घेतली जाणार आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱया या स्पर्धेत वीस राज्यातील सुमारे 300 महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत. भारतामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा घेतली जात आहे. सदर स्पर्धा 17 वर्षाखालील (कॅडेट), 20 वर्षाखालील (कनि÷) आणि वरि÷ अशा विविध गटांमध्ये खेळविली जाणार आहे.
वरि÷ महिलांच्या सॅब्रे या प्रकारात भवानीदेवी सहभागी होणार आहे. ती या स्पर्धेत तामिळनाडू राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. लीग पद्धतीने खेळविल्या जाणाऱया या स्पर्धेत जम्मू-काश्मीरची श्रेया गुप्ता, छत्तीसगढची वेदिका खुशी, हरियाणाची तनिष्का खत्री हे स्पर्धक सेबर समशेरबाजी प्रकारात तर हरियाणाची शीतल दलाल ईपी समशेरबाजी प्रकारात भाग घेणार आहे.
लीग टप्पा संपल्यानंतर थेट बाद टप्प्याला प्रारंभ होईल. लीग टप्पा आंतरराष्ट्रीय समशेरबाजी फेडरेशनच्या नियमावलीनुसार खेळविला जाईल. खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन महिलांसाठी यापूर्वी तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती, हॉकी, फुटबॉल हे क्रीडा प्रकार घेतले गेले होते. या स्पर्धेसाठी प्रत्येक टप्प्यासाठी 17.10 लाख रुपयांची बक्षिसांची रक्कम ठेवण्यात आली आहे.