पाच टन कचऱयावर होणार प्रक्रिया : तीन ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी वर्क ऑर्डर
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका हद्दीत ओल्या कचऱयाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात तीन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेऊन निविदा काढल्या होत्या. खासबाग निवारा केंद्र, नेहरूनगर इंदिरा कॅन्टीन आणि एपीएमसी आवार अशा तीन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र यापैकी एपीएमसीमधील प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून पाच टन क्षमतेचा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येत आहे.
दररोज 250 टनांहून अधिक कचरा जमा होत आहे. ओल्या कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. सध्या ओला आणि सुका कचरा वेगळा करून घेतला जातो. तरीदेखील विघटनाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च होत आहेत. तसेच कचरा वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी वर्षाला 25 कोटींहून अधिक खर्च होत आहे. त्यामुळे खर्चात कपात करण्यासह कचऱयापासून वीजनिर्मिती आणि गॅस निर्मिती करण्याच्या दृष्टीने तीन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
खासबाग येथील निवारा केंद्रात जेवण बनविण्यासाठी गॅसपुरवठा करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच नेहरूनगर येथील इंदिरा कॅन्टीन परिसरात बायोगॅस प्रकल्प राबवून इंदिरा कॅन्टीनला गॅसपुरवठा करण्याचा विचार आहे. एपीएमसीत बायोगॅस प्रकल्प राबवून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करून पथदीपांसाठी विजेचा उपयोग करण्याचा प्रस्ताव होता. याकरिता महापालिकेने निधीची तरतूद करून निविदा मागविल्या होत्या. या निविदा पात्र ठरल्या असून बायोगॅस प्रकल्प राबविण्यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. पण यापैकी एपीएमसीमधील भाजी मार्केट गांधीनगर येथे स्थलांतर झाल्याने कचऱयाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे याठिकाणी हा प्रकल्प राबविण्याबाबत सांशकता निर्माण झाली होती. पण एपीएमसीसह परिसरातील कचरा जमा करून प्रकल्पात देणे शक्मय आहे. त्यामुळे एपीएमसीत बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच एपीएमसीमधील बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.
प्रकल्प लवकरच हेणार पूर्ण
बायोगॅस प्रकल्पासाठी विविध यंत्रोपकरणे बसविण्यात येणार असल्याने याठिकाणी यंत्रोपकरणे बसविण्यासाठी फौंडेशन बनविण्यात येत आहे. तसेच टाक्मया बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करून सुरू केला जाईल, अशी महापालिकेच्या अधिकाऱयांना अपेक्षा आहे.