पालकमंत्री गोविंद कारजोळ : खानापुरात प्रचारसभा
वार्ताहर /खानापूर
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजप सरकारने विकासाचे पाऊल पुढे टाकले आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त भारत बनविण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. सर्वसामान्य शेतकरी व शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी भाजप सरकारने नेहमी सकारात्मक पावले उचलली आहेत. वायव्य पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणावे, असे आवाहन केले. आगामी काळात म्हादई प्रकल्प पूर्णत्वाला आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक हजार कोटांची तरतूद करण्यात आली आहे.
मंगळवारी शुभम गार्डनमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका घटकचे अध्यक्ष संजय कुबल होते. स्वागत माजी आमदार संजय पाटील यांनी केले. वायव्य पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हणमंत निराणी यांनी, आपले मत देऊन मला निवडून आणावे, असे आवाहन पेले. वायव्य शिक्षक मतदारसंघातील उमेदवार आमदार अरुण शहापूर यांनी विचार व्यक्त केले. व्यासपीठावर आमदार आनंद मामनी, भारती मगदूम, विश्वनाथ पाटील, विठ्ठल हलगेकर, एन. रविकुमार, आमदार महांतेश दोड्डगौडर, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, विठ्ठल पाटील, जोतिबा रेमाणी, बाबुराव देसाई, शरद केशकामत, सुनील चिगुळकर उपस्थित होते.