कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर शहर उत्तर पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात काटाजोड लढत झाली. या पोटनिवडणूकीत भाजपला पराभव पत्करावा लागला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव ह्या विजयी झाल्या.या निकालाच्या पार्श्वभुमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरकरांचा निर्णय मान्य असल्याचं जाहीर केले.
आम्ही कोल्हापुर पोटनिवडणूक ही विकासावर लढलो आहे. देशात, राज्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये संधी मिळाली आहे. कोल्हापूरसाठी पालकमंत्र्यांनी काय केलं हे सांगावं, असा सवाल भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपाचे उमेदवार नाना कदम लढले तर विरोधकांच्या तोंडाला फेस आला, मग मी लढलो तर काय होईल पहा असा अप्रत्यक्षरित्या टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. आज कोल्हापुरात ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. हिंदुत्व हेच पुरोगामीत्व आहे. सावरकर हिंदुत्ववादी होते. ते विज्ञाननिष्ठ होते. आपल्या धर्माचं पालन करताना हिंदूंनी इतरांचा आदर केला पाहिजे. हिंदुत्व आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. इतर पक्षासारखी राजकीय गरज म्हणून ही भूमिका भाजपाने मांडलेली नाही. या मतांमध्ये 18 हजारांचा फरक पडला आहे. ही लढत तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी झाली आहे. आम्ही एकट्याने 77 हजार मते क्रॉस केली आहेत. भाजपाने सत्ताधाऱ्यांना तोंडाला फेस आणला आहे. ही अटीतटीची निवडणूक होती. हे देशाच्या लोकशाहीचे सौदंर्य आहे. भाजपानं नागरिकांनी दिलेला कौल मान्य केला आहे. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. दडपशाही, दंडुकेशही, जातीचा वापर या सगळ्याला न घाबरत त्यांनी काम केलं असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे.