ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri East bypoll) निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाकडून रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) तर भाजप कडून मुरजी पटेल (Muraji patel) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मध्यस्थाची भूमिका घेत ‘भाजपने ही निवडणूक लढवू नये’ अशी विनंती भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DY CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे.
हे हा वाचा : आयुष्यात कधीही भाजपबरोबर जाणार नाही : नितीश कुमार
‘रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी फडणवीस यांना केली.