ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress president Election) शशी थरुर (Shashi Tharoor) आणि मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यात थेट लढत होत आहे. खरगे यांना मिळणारा पाठिंबा पाहता तेच नवे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. याचदरम्यान, शशी थरुर यांनी एक मोठं विधान केलंय. भाजपाने २०२४ च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्ष बनण्याची तयारी करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
शशी थरुर यांनी आपण जर पक्षाचे अध्यक्ष झालो, तर कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार बदल घडवू असा दावा केला आहे. दरम्यान शशी थरुर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेवून भाजपला आव्हान दिलं आहे. की २०२४ च्या निवडणुकीनंतर भाजपने विरोधी पक्ष बनण्याची तयारी सुरू करावी. कारण निवडणूकीनंतर त्यांना तिथेच बसावे लागणार आहे, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
पुढे थरूर म्हणाले, काँग्रेस (Congress) पक्षाने देश उत्तम चालवला आहे. पक्षाकडे अनुभवी लोक आहेत, असं काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि खासदार शशी थरुर यांनी म्हटलं आहे. तसंच, भाजपाने २०२४ च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्ष बनण्याची तयारी करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे, येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नव्या जोमाने येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हे ही वाचा : संजय राऊतांची दिवाळी जेलमध्ये? न्यायालयाकडून जामीन नाहीच
“काँग्रेस पक्ष यशस्वी झाल्याचे आम्हाला मतदारांना दाखवायचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला केवळ १९ टक्के मते मिळाली होती. गेल्या दोन निवडणुकांपासून जे मतदार आमच्यासोबत नाहीत त्यांना सोबत आणायचे आहे. ते पुढे म्हणाले की, मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवावा यासाठी पक्ष आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण असणे आवश्यक आहे, असं शशी थरुर म्हणाले.
थरूर म्हणाले की, आमच्या पक्षाला बदलाची गरज आहे आणि मला वाटते की केवळ मीच पक्षात बदल घडवून आणू शकतो. यावेळी थरूर यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजपने विरोधी पक्ष बनण्याची तयारी सुरू केली पाहिजे कारण त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तिथेच बसावे लागेल.”