केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांचा विश्वास
प्रतिनिधी/ सातारा
जगात सर्वात प्रतिभाशाली नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले जात आहे. कोणतीही समस्या उद्भवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विचारात घेऊन तिचे निराकारण केले जाते. केंद्र शासनाच्या माध्यमातू सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवण्यात आलेल्या आहेत. या योजनांमुळेच सातारा लोकसभा मतदार संघ 2024 ला भाजपाच असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यायला संसदेत भाजपाच साताऱयाच खासदार असेल असा विश्वास केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी व्यक्त केला. दरम्यान, तीन दिवस दौऱयावर असलेल्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सोम प्रकाश यांच्या दौऱयाचे पुरते नियोजन कोलमडले असल्याचे दिसत होते.
साताऱयात स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लाभार्थी सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, अतुल भोसले, माजी आमदार मदन भोसले, सुवर्णा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री सोम प्रकाश म्हणाले, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनले तेव्हापासून त्यांनी देशातील गोरगरीब जनता केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरु केल्या आहेत. करोडो लोकांना त्याचा लाभ आज होत आहे. कोरोनासारखी महामारीवर नियंत्रण मिळवता आले. जगात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच प्रभावशाली नेतृत्व आहे. त्याचा आम्हाला गर्व आहे. भारत महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे याचा आम्हाला आनंद आहे. आमचे लक्ष भ्रष्टाचार नष्ट करणे होते. ते सुरु आहे. 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान निवडून येणार आहेत. साताऱयातून भाजपाचा खासदार निवडून संसदेत जाणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयकुमार गोरेंच्याकडून काँग्रेसचा उच्चार
आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीलाच काँग्रेसच्या जमलेल्या पदाधिकाऱयांनो असे उच्चारताच हशा पिकला. पुढे त्यांनी स्वतःला सावरत हसलात का सगळे, तुम्हाला सगळय़ांना हसण्यासाठी असे बोलावे लागले असे म्हणून या सातारा जिह्यात आता भाजपाचे दोन आमदार आहेत. 2024 च्या निवडणुकीत चार होतील. सोम प्रकाश साहेब तुमच्या आजुबाजूला बसले आहेत ते सारे आमदार होतील, खासदारही भाजपाच होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते आणि शिवेंद्रराजेंचे दमदार भाषण
लाभार्थी सन्मान मेळाव्याची वेळ दुपारी 1 ची कळवण्यात आल्याने जावली तालुक्यातून आमदार शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर रांजणे यांच्यासह सातारा तालुक्यातील प्रतिक कदम, धर्मराज घोरपडे, नामदेवराव सावंत यांनी कार्यकर्ते आणले होते. मात्र, सोम प्रकाश हे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आले. तोपर्यंत सर्वच उपस्थित वैतागून गेले होते. त्यातूनच फक्त एकमेव आमदार शिवेंद्रराजेंनी आपल्या दमदार भाषणात मंत्री सोम प्रकाश यांनी घेतलेल्या बैठकीतील मुद्दे नमूद केले.
खासदार उदयनराजेंचा एकही कार्यकर्ता फिरकला नव्हता
केंद्रीय मंत्री यांच्या दौऱयात खासदार उदयनराजेंचे एकही कार्यकर्ते कुठेही दिसले नव्हते. तसेच शहरात लागलेले शुभेच्छाच्या बॅनरही विनापरवाना लागल्याचे दिसत होते. लाभार्थी सन्मान मेळाव्याच्या ठिकाणीही खासदार उदयनराजेंचा बॅनर दिसत नव्हता वा तेही उपस्थित नव्हते. त्यांचे कोणतेही कार्यकर्ते दिसत नव्हते. तसेच मंत्र्यांचा ज्यादा वेळ हा फाईव्ह स्टार हॉटेलवरच प्रेश होण्यात व बैठकीत गेल्याचे समजते.
लाभार्थ्यांना साधे पाणी सुद्धा नाही
लाभार्थी सन्मान मेळाव्यासाठी बोलवण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी दुपारी 1 वाजल्यापासून सभागृहात केंद्रीय मंत्री व मान्यवरांच्यासाठी प्रतिक्षा केली. त्या बदल्यात त्यांना साधे पाणीही मिळाले नाही. मोजक्याच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामध्ये लिलाबाई गोळे, रमेश कदम, शिवराम घोरपडे, शबनम मुल्ला, मथुरा भोसले, संगीता जाधव, संजय सूर्यवंशी, धनाजी घोरपडे, अण्णा जाधव यांचा समावेश होता.
महागणपतींची आरतीचे फळ मिळणार काय?
जिह्याच्या तीन दिवस दौऱयावर आलेले केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या नियोजनाचे तीन तेरा वाजले आहेत. शिरवळ येथे फक्त फुलांची उधळण त्यांच्यावर केली खरी परंतु नियोजन केल्यानुसार ते कोठेही वेळेवर पोहचले नाहीत. वाई येथील महागणपती मंदिराच्या आरतीची वेळ तर सकाळी 10 ची होती. त्यामुळे तेथे दहा वाजताच कार्यकर्ते हजर राहिले आणि मंत्री आले ते दुपारी 1 वाजता. तोपर्यंत बहुतेकजण निघून गेले होते. तर काही जणांची नुसतीच लुडबुड फोटोसेशनपुरती सुरु होती. त्यातच अनेक मतभेद असल्याने 2024 ची जागा जिकंण्याच्या हेतूने केलेल्या नियोजित दौऱयामध्ये झालेल्या महाआरतीचे फळ मिळणार काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.