रत्नागिरी, पुणे येथील रिक्त पदे ठेवण्याचे दिले आदेश; भरती पकियेत माजी सैनिकांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्याची आशा
रत्नागिरी प्रतिनिधी
माजी सैनिकांना राखीव असलेल्या गार्ड या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती प्रक्रियेमध्ये डावलले असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. भरती संदर्भातील प्रक्रियेबाबत अधिक प्रतिज्ञापत्र दाखल करायचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते यांच्यासाठी पदे रिक्त ठेवण्याचेही आदेश माजी सैनिक प्रकाश पालांडे यांनी अŸड. राकेश भाटकर यांचेमार्पत दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी दिले.
स्टेट बँक ऑफ इंडियात गार्ड या पदासाठी काही पदे ही माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना पत्र पाठवण्यात आले. त्या पत्रामध्ये या पदासाठी आवश्यक असणाया पात्रतेच प्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यातील सैनिक कल्याण केंद्राने पात्र उमेदवारांची एक यादी तयार करून स्टेट बँक ऑफ इंडिया ला पाठवून दिली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिह्यामध्ये 256 पद रिक्त असूनही फक्त 139 उमेदवार निकषांवर पात्र आढळल्याने त्यांची नावे पाठवली गेली होती. परंतु भरती प्रक्रियेमध्ये कोणतेही नियमांचे पालन न करता फक्त मोजक्याच लोकांना फोन द्वारे मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरीतील फक्त 6 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले आणि त्यातील फक्त एकाच उमेदवाराची नेमणूक केली. त्यामुळे पात्र उमेदवारांवरती अन्याय झालेला असल्यामुळे प्रकाश पालांडे यांनी अॅड. राकेश भाटकर यांच्यामार्पत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी महाराष्ट्राचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व आहुजा यांच्या खंडपीठासमोर 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. सुनावणीवेळी स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे भरती प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आल्याने याचिका फेटाळावी, असे प्रतिज्ञापत्र स्टेट बॅंक ऑफ इंडिया तर्फे दाखल करण्यात आले होते.