उत्तर प्रदेशातील यमुना नदीच्या तटावर आग्रा हे ऐतिहासिक शहर वसले आहे. यमुना नदी पुढे गंगा नदीला मिळते. आग्रा शहराच्या परिसरात तिला पतितपावनी गंगा असेही संबोधले जाते. या नदीत एक कुंड असे आहे, की ज्यात अस्थिविसर्जन केले असता 72 तासांत अस्थि पाण्यात विरघळून नाहीशा होतात. विज्ञानालाही बुचकळय़ात टाकणारी ही प्रक्रिया कशी होते? याचे संशोधन आता करण्यात येत आहे. या कुंडाची ही ख्याती अनेक शतकांपासून आहे. पण त्यावर विज्ञाननिष्ठ लोकांचा विश्वास आतापर्यंत बसत नव्हता. केवळ ही एक लोकप्रिय वदंता आहे, अशीच वस्तुनिष्ठ विचार करणाऱयांची समजूत होती. तथापि, हे खरोखरच घडताना दिसून येत असून त्याचे प्रत्यंतरही आलेले आहे.
कासगंज येथे हे कुंड असून त्याला हरिपदी गंगा असे नाव आहे. सनातन धर्माच्या दृष्टीने याचे स्थानमहत्त्व अनादि काळापासून असल्याचे सांगितले जाते. प्रतिवर्ष लाखो भाविक येथे अस्थिविसर्जनासाठी येतात. इतरही धार्मिक कृत्ये मोठय़ा प्रमाणावर केली जातात. इतकी वर्षे सातत्याने अस्थिविसर्जन केलेले असूनही या कुंडाच्या तळाशी अस्थिंचा मागमूसही सापडत नाही. याचे रहस्य जाणण्यासाठी आता संशोधन सुरू असून त्यानंतरच याचा उलगडा होण्याची शक्मयता आहे.
साधारणतः अस्थि विघटित होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो. लाखो वर्षांपूर्वीचे भूमिगत झालेले अस्थिपंजर आजही उत्खननात सापडतात. तथापि, हे कुंड मात्र त्याला अपवाद असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही सर्वांचा यावर विश्वास आहे, असे नाही. तथापि, प्रत्यक्ष प्रयोगातून असा अनुभव आल्याने अधिक संशोधनाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले जात आहे.