पुणे / प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारने आपल्या 7,517 किमी लांबीच्या किनारपट्टीच्या विशाल क्षमतेचा उपयोग करण्यासाठी ‘सागरमाला’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि किनारपट्टीवर बंदरे, आणि इतर पायाभूत सुविधा विकसित करून अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे, असे मत केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाज व जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
एमआयटी महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड टेनिंग द्वारा आयोजित ‘एचआर मीट 2023’मध्ये ते बोलत होते. नाईक म्हणाले, ‘सागर माला’ उपक्रमातून देशातील युवकांना रोजगार मिळाले आहे. किनारपट्टीच्या विशाल क्षमतेचा उपयोग देशाच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केला जात आहे. ‘सागरमाला’ हा उपक्रम भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक गेम चेंजर आहे. आमच्या किनारपट्टीवर रोजगार निर्माण करण्याची आणि आर्थिक विकासाला चालना देण्याची अफाट क्षमता आहे. या उपक्रमामुळे केवळ नवीन रोजगार निर्माण होणार नाहीत, तर शिपिंग आणि सागरी उद्योगांना चालना मिळेल.
अधिक वाचा : पुण्यात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी