प्रतिनिधी/रायबाग: बीएससीच्या शिक्षणाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रायबाग तालुक्यातील यलपरट्टी येथे समोर आली आहे.
निंगण्णा चिदानंद न्हावी (२२) असे मृताचे नाव आहे. मृत तरुण जमखंडी येथील बीएलडी महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होता. मात्र 3 दिवसांपूर्वी तो गावी परतला होता आणि आज त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी जेव्हा आईचे डोळे उघडले तेव्हा मुलाला अशा अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला.
आत्महत्येपूर्वी त्याने डेथ नोटही लिहून ठेवली असून, मला माफ करा, मला बीएससीचे शिक्षण घेणे आवडत नव्हते, पण घरची परिस्थिती अशी होती कि नाईलाजाने मला शिकावं लागत होता.
हारुगेरी पोलिस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.