ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी काल दिवसभराच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यावेळी राऊत यांच्या घराबाहेर जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यानंतर आता अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही राऊतांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे.
आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “गमावलेले हक्क अन्याय करणाऱ्या लोकांच्या विवेकबुद्धीला आवाहन करून परत मिळत नसतात, तर सतत संघर्षाने मिळतात. बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर”
राज्यातील राजकीय घडामोडी आणि सद्यपरिस्थितीला अनुसरुन आव्हाड यांनी हे ट्विट केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य आहे. दरम्यान, थोडय़ाच वेळात संजय राऊत यांना जेजे रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी नेण्यात येणार आहे. त्यानंतर 11:30 वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; घरगुती गॅस सिलिंडरच्या…