प्रतिनिधी/ बेळगाव
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण गड-किल्ल्यांमुळे झाले. महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी मोठय़ा शिताफीने शत्रूच्या ताब्यातील किल्ले परत मिळविले. गड-किल्ल्यांचा स्वतंत्र असा इतिहास आहे. त्यांची माहिती पुढील पिढय़ांना होऊन व स्वराज्याचे रक्षण करण्याच्या जबाबदारीची जाणीवही व्हावी या हेतूने दिवाळीमध्ये किल्ले साकारले जातात.
बेळगाव शहर आणि तालुक्यामध्येही तरुणाई व बालचमू मोठय़ा हौसेने किल्ल्याच्या प्रतिकृती साकारतो. यासाठी त्यांचे परिश्रम कौतुकास्पद आहेत. म्हणूनच आम्ही आपल्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आपण तयार केलेल्या किल्ल्याचा एक फोटो आणि व्हिडिओ आपण ‘तरुण भारत’कडे पाठवून द्या. आम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. यासाठी केवळ किल्ल्याचाच फोटो पाठवणे आवश्यक आहे. कृपया किल्ल्यासमोर उभे असणाऱया मंडळातील सदस्यांसोबतचे किंवा किल्ला साकारणाऱयांनी वैयक्तिक फोटो पाठवू नयेत.
यासाठी किल्ल्याची प्रतिकृती अचूक असावी. त्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगता यावे. किल्ल्याची उंची किमान 3 फूट व रुंदी 6 फुटांहून अधिक असावी. आपण आपल्या किल्ल्याचा फोटो, किल्ला बनविणाऱया मंडळ अथवा ग्रुपचे नाव, गावाचे नाव 9341473947 या क्रमांकावर तर क्हिडिओ 9379777388 या क्रमांकावर पाठवून द्यावा. अधिक माहितीसाठी 0831-2404333 या क्रमांकावर संपर्क साधावा.