पुणे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणार ध्वनी प्रदूषण हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी वाकड ते नऱ्हेदरम्यान या मार्गावर साऊंडप्रुफ वॉल / बॅरियर उभारावेत, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना लिहिले आहे. त्यांनी या पत्राचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदुषणाच्या समस्येबाबत लक्ष घालावे, अशी विनंती गृहनिर्माण संस्था आणि विविध संस्था करत आहेत, असे सांगत हा प्रश्न सोडविला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
चांदणी चौकात मेट्रो आणि उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसेच याच महामार्गावर नवले पूल परिसरात होणारे अपघात हेदेखील चिंतेचा विषय बनले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.