वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुखापतीच्या संकटातून बाहेर सरण्यासाठी धडपडत असलेल्या जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्याने त्याला आयपीएलला मुकावे लागणार असून पुढील सहा महिन्यांत त्याचे पुनरागमन होण्याची शक्मयता कमी असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या वषी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेलाही मुकावे लागलेल्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाला पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागेल का हे अद्याप निश्चित झालेले नाही.
बुमराह आयपीएलमध्ये उतरू शकणार नाही. कारण त्याला पुनरागमनासाठी आणखी सहा महिने तरी लागतील. त्यानंतरही तो पुनरागमन करू शकेल किंवा न करू शकेल. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत त्याने खेळणे हे लक्ष्य आहे, परंतु त्याचीही खात्री देता येणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. या घडामोडीचा अर्थ असा आहे की, भारत जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास बुमराहला 7 जूनपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या या फेरीला मुकावे लागणार आहे.
बुमराहला सुऊवातीला भारताच्या ‘टी20’ विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान देण्यात आले होते. ‘आयपीएल’ 31 मार्चपासून सुरू होत असून बुमराह मागील अनेक हंगामांत मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज राहिलेला आहे. दुसरीकडे, एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. 29 वषीय बुमराह गेल्या वर्षी मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये खेळण्याच्या तिरिक्त फक्त पाच कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि काही ‘टी20’ सामने खेळलेला आहे.
बुमराह त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे त्याच्या पाठीवर खूप ताण टाकतो. वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगने बुमराहला नेहमीच पाठीच्या दुखापतीच्या धोका आहे, याकडे लक्ष वेधले होते. मागील वषी पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला होता. ‘टी20’ विश्वचषकापूर्वी मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या ‘टी20’ मालिकेसाठी त्याला संघात परत घेण्यात आले होते. तेव्हापासून तो क्रिकेट खेळलेला नाही.