‘अन्नभाग्य’ तांदळाची काळय़ाबाजारात विक्री : दूध पावडरवरही डल्ला : संबंधितांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातून अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून दिला जाणारा तांदूळ महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. केवळ बेळगावच नव्हे तर जिल्हय़ातील वेगवेगळय़ा तालुक्मयात तांदळाचा काळाबाजार करणाऱया टोळय़ा कार्यरत आहेत.
गेल्या आठवडय़ात मुरगोड ता. सौंदत्ती पोलिसांनी यरगट्टीजवळ एक ट्रक अडवून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा 25 टन रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. एमएच 09, सीए 3662 क्रमांकाच्या ट्रकमधून हा तांदूळ महाराष्ट्रात नेण्यात येत होता. प्रत्येकी 50 किलोची 500 पोती पोलिसांनी जप्त केली आहेत. मुरगोड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विकणाऱया टोळय़ा कार्यरत
तांदळाचा काळाबाजार हा काही नवा प्रकार नाही. अत्यंत नियोजनबद्धरित्या सुव्यवस्थितपणे रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विकणाऱया टोळय़ा कार्यरत आहेत. खासकरून रेशन दुकानातून गरिबांना तांदळाचे वाटप झाल्यानंतर घरोघरी जाऊन तो जमविण्यापासून एकाच नमुन्याच्या पोत्यात भरून एखाद्या वेगळय़ा ब्रँडखाली तो बाजारात आणण्यापर्यंत अत्यंत व्यवस्थितपणे काम चालते.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग हा इतर तस्कर व गुन्हेगारांप्रमाणेच तांदळाचा काळाबाजार करणाऱयांसाठीही राजमार्ग आहे. बेळगाव शहरातील गांधीनगर परिसरात तांदूळ दुसऱया पोत्यात भरून तो महाराष्ट्रात पाठविणाऱया टोळीचा अड्डा आहे. याबरोबरच आणखी काही ठिकाणी काही प्रमुख व्यापारी तांदळाचा काळाबाजार करतात.
सरकारी यंत्रणेला हाताशी धरून प्रसंगी त्यांची नजर चुकवून महाराष्ट्रात साठा पाठविला जातो. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची सत्ता असताना या राज्यातील कोणीही उपाशीपोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्नसुरक्षा मिळावी यासाठी एक रुपये प्रतिकिलो दराने दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना तांदूळ वाटप करण्याची योजना सुरू झाली. कोरोनामुळे आता तर मोफत धान्य वाटप सुरू आहे.
अनेकजण या तांदळाचा भात शिजवून खातातच असे नाही. इडली, दोसे तसेच भाकरी आदी पदार्थ बनवून खातात. काही जण अतिरिक्त तांदळाची स्वस्तात विक्री करतात. अशा पद्धतीने विकत घेतलेला तांदूळ साठवून तो पोत्यात भरून त्याची तस्करी केली जाते. याबरोबरच काही रेशन दुकानांशी हातमिळवणी करून त्यांच्याकडून घेतलेला तांदूळ बाजारपेठेत आणण्याचा प्रकारही घडतो.
अन्न सुरक्षिततेसाठी स्वस्तात दिल्या जाणाऱया धान्याची काळय़ा बाजारात विक्री करण्यात येत आहे. तहसीलदार, अन्न व नागरीपुरवठा खाते, पोलीस, महसूल खात्याच्या अधिकाऱयांची ही तस्करी रोखण्यासाठी धडपड दिसायला हवी. कारण ती रोखण्याची जबाबदारी या खात्यांकडे आहे. सरकारी यंत्रणेला त्यांचा वाटा न पोहोचवता केली जाणारी तस्करी रोखली जाते. अलिखित नियमानुसार यंत्रणेला हाताशी धरणाऱयांची वाहने बिनदिक्कतपणे महामार्गावर फिरतात.
कसून चौकशी करण्याची गरज
मुरगोड पोलिसांनी ताब्यात घेतलेला 25 टन तांदूळ बैलहोंगल एपीएमसीजवळील रमेश आडव्याप्पा गाणगेर यांच्या गोदामातून आणल्याची कबुली रफिक देसाई, रा. संकेश्वर या ट्रकचालकाने दिली आहे. खासगी गोदामात रेशन दुकानातील तांदूळसाठा कसा पोहोचला? याची कसून चौकशी करण्याची गरज आहे.
केवळ तांदूळ आणि गहूच नाही तर अंगणवाडय़ातून लहान मुलांना वाटल्या जाणाऱया दूध पावडरचीही खुल्या बाजारात विक्री करणाऱया टोळय़ा कार्यरत आहेत. गेल्या वषी यमकनमर्डी पोलीस स्थानकासमोर उभ्या असलेल्या कारमधून 9 किलो 900 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर तांदूळ व दूध पावडर तस्करीत पोलीस व इतर शासकीय अधिकाऱयांचा सहभाग कसा आहे, याचा उलगडा झाला होता.
बागलकोट जिल्हय़ात तर मोठय़ा प्रमाणात दूध पावडरची तस्करी उघडकीस आली होती. या पावडरचा वापर खवा बनविण्यासाठी केला जातो. 20 ऑक्टोबर 2020 रोजी जमखंडी पोलिसांनी 12 टन दूध पावडर जप्त केली होती. हे प्रकरण एका वरि÷ अधिकाऱयाच्या सांगण्यावरून पोलिसांनी दडपले होते. सध्या या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे आहे.
तस्कर होताहेत गब्बर…
ग्रामीण भागात काहीजण तांदूळ गोळा करण्यासाठी वाहने घेऊन फिरतात. नागरिक आपण वापरून उरलेले तांदूळ त्यांना देतात. त्याच्या बदल्यात भांडी किंवा इतर घरगुती साहित्य दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात तांदूळ गोळा करून त्याची विक्री करणाऱया व्यापाऱयांचाही वावर आहे. त्यांचा व्यवहार छोटय़ा प्रमाणात असतो. तस्करी करणारे गुन्हेगार मात्र एका गोदामातून दुसऱया गोदामात सरकारी माल हलवून गब्बर होत आहेत.