वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत पुढील 10 वर्षात जगातील सहाव्या क्रमांकाची विमा बाजारपेठ बनणार आहे, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
स्वित्झर्लंडस्थित प्रमुख पुनर्विमा कंपनी स्विस रेने यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील एकूण विमा प्रीमियम पुढील दशकात स्थानिक चलनात सध्याच्या मूल्यांनुसार सरासरी 14 टक्के दराने वाढ होईल. 2032 पर्यंत, एकूण प्रीमियम व्हॉल्यूमच्या बाबतीत भारत सहाव्या क्रमांकाची विमा बाजारपेठ बनेल. 2021 मध्ये 10 व्या क्रमांकावर राहिला असल्याचेही सांगितले आहे.
भारतीय आयुर्विमा उद्योग यावर्षी 6.6 टक्के (वास्तविक अर्थाने) असाधारण दराने वाढेल आणि 2023 मध्ये 7.1 टक्के दराने वधारणार असल्याचे संकेत आहेत. यासोबतच वाढीचा दर लक्षात घेता, 2022 मध्ये भारतातील जीवन विमा प्रीमियम प्रथमच 100 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणार आहे.
सामान्य विमा बाजाराच्या संदर्भात, अहवालात म्हटले आहे की 2020 मध्ये थोडय़ा घसरणीनंतर 2021 मध्ये 5.8 टक्के वाढ झाली आहे. महागाई वाढीचा दर यंदा किंचित कमी होऊन 4.5 टक्के राहील. तथापि, 2023 ते 2032 दरम्यान या क्षेत्राची वार्षिक आठ टक्के वाढ अपेक्षित आहे.
चलन वाढीचा प्रभाव
चलनवाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या मार्गावर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.