संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल
वृत्तसंस्था/संयुक्त राष्ट्रसंघ
भारताची शहरी लोकसंख्या 2035 पर्यंत 67.5 कोटीवर पोहोचण्याचा अनुमान आहे. याप्रकरणी चीनच्या एक अब्ज शहरी लोकसंख्येच्या तुलनेत भारत दुसऱया स्थानावर असणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात हा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोना महामारीनंतर जगात शहरांमध्ये राहणाऱया लोकांची संख्या पूर्वीइतकीच झाली आहे. 2050 पर्यंत यात 2.2 अब्जाची वृद्धी होण्याची शक्यता आहे. जगातील शहरीकरणाबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यात वेगाने होणाऱया शहरीकरणावर कोरोना महामारीचा तात्पुरता प्रभाव पडला असल्याचे म्हटले गेले आहे.
भारताची शहरी लोकसंख्या 2035 पर्यंत 57,54,56,000 पर्यंत पोहोचण्याचा अनुमान आहे. 2020 मध्ये हे प्रमाण 48,30,99,000 इतके होते. तर 2025 पर्यंत हा आकडा 54,27,43,000 आणि 2035 पर्यंत 60,73,42,000 होण्याची शक्यता आहे. 2035 पर्यंत शहरी क्षेत्रांमध्ये राहणाऱया लोकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 43.2 टक्के होईल.
चीनमध्ये 2030 पर्यंत शहरी लोकसंख्या 1.05 अब्ज होईल. आशियातील शहरांमध्ये राहणाऱया लोकांची संख्या 2.99 अब्ज होणार आहे. दक्षिण आशियात हा आकडा 98.76 कोटी असणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार चीन आणि भारत यासारख्या मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये जागतिक लोकसंख्येत मोठी हिस्सेदारी आहे. तसेच या देशांमध्ये आर्थिक प्रगतीमुळे जागतिक असमानतेवर सकारात्मक स्वरुत्पात प्रभाव पडला आहे.
आशियात मागील दोन दशकांमध्ये चीन आणि भारताची आर्थिक वृद्धी आणि शहरीकरण वेगाने वाढले आहे. यामुळे गरीबीत जगणाऱया लोकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अल्प उत्पन्न गटाच्या देशांमध्ये जन्मदर वाढण्यासह वर्तमान शहरी लोकसंख्येतील वृद्धी सुरूच राहणार आहे. याचबरोबर 2050 पर्यंत एकूण जागतिक लोकसंख्येत शहरांमध्ये राहणाऱया लोकांचे प्रमाण 68 टक्क्यांवर पोहोचण्याचा अनुमान आहे. सध्या हे प्रमाण 56 टक्के आहे.