विजय जाधव / गोडोली :
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत. आता सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३०, ३३, ३८, ४३ नुसार उपसरपंचाची पहिल्या सभेत निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र राजकीय डावपेच ठरवून उपसरपंच निवड करण्यात सरपंच टाळाटाळ किंवा त्या सभेवेळी सरपंच गैरहजर राहण्याची शक्यता असते. उपसरपंच निवड करणे, हे सरपंचांचे कायदेशीर दृष्ट्या कर्तव्य असल्याने कसूर केली तर ते अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे उपसरपंच निवड करण्यात काही आयडिया कराल तर अंगलट येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुक म्हणजे ग्रामीण भागात जणू उत्सव साजरा केल्या सारखे असते. गटातटात अटीतटीची लढत आणि निकालीची उत्सुकता शिगेला पोहोचत असते. नव्याने होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचासह सदस्यांची निवड केली आहे. अनेक गावात गड आला पण सिंह गेला, सरपंचांच्या विरोधात अधिक सदस्य निवडून आले की गावठी तिढ्यांचे राजकारण केले जाते.
उपसरपंच निवड करणे, हे सरपंचांचे अध्यक्षतेखाली सभेत होणार असून ते कायदेशीर कर्तृत्व पार पाडावे लागते. सरपंचाकडून उपसरपंच निवड प्रक्रिया ही पहिल्या ग्रामपंचायत सभेत बहुमताने केली जाते. सदर सभा घेऊन ही निवड करण्यात काही सरपंच टाळाटाळ करतात तर काही सभा बोलावून गैरहजर राहतात. अशी स्थिती ज्या गावात निर्माण होईल, येथील सरपंचाने कलम ३०,३३, ३८,४३ नुसार कर्तव्यात कसूर केली समजून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली तर ते सरपंच अपात्र ठरतात.
त्यामुळे उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची सभा बोलावून उपसरपंच निवड करणे, रिक्त पदे भरण्याचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्या कसूर केलेले सिध्द झाले तर ते अपात्र ठरु शकतात. गावठी तिढ्यांचे राजकारण करण्यात टाळाटाळ,न करण्यासाठी काही आयडिया कराल तर ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३०,३३, ३८,४३ अंतर्गत उपसरपंच निवड करण्यात कसूर केली म्हणून अपात्र ठरतील.