ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सध्या देशात सर्वत्र नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात काही राजकीय पक्ष आणि विदेशींचा हात आहे. तसेच देशात हिंसेचं वातावरण निर्माण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप योगगुरू रामदेव बाबा यांनी केला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप केला आहे.
ते म्हणाले, या आंदोलना दरम्यान आझादीचे नारे लगावले जात आहेत ते चूकीचे आहे. आपला देश प्रत्येकाचा देश आहे.
काही लोक अल्पसंख्याकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात हिंसेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे काही राजकीय पक्ष आणि विदेशींचा हात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.