ऑनलाईन टीम/तरुण भारत
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे असेच सहकार्य राहू द्या अस त्यांनी म्हटलं आहे. या वक्तव्याचा अर्थ काय? मुख्यमंत्री कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री संयम आणि शांत आहेत का? असा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे का असे तर्कविर्तक लावण्यात येत आहेत. (Maharashtra Shiv Sena Latest Updates Uddhav Thackeray News)
महाराष्ट्राच्या राजकारणात कालपासून राजकीय भूकंप झाला आहे. ज्या पध्दतीने घटना-घडोमोडी घडत आहेत. त्यानुसार या कॅबिनेटच्या बैठकिकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र बैठक झाल्यानंतर अत्यंत खेळीमेळीत बैठक पार पाडल्याचे नेते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मविआ अल्पमतात आल्यानंतर त्यांना याचे गांभीर्य आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच मविआत अलबेल आहे अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आले आहे.
हेही वाचा- अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न; नितीन देशमुखांचा गंभीर आरोप
आता नगरसेवकही मैदानात
एकनाथ शिंदेंच्या बंडाला आता आमदारांबरोबर नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यात मुंबईतील २०, ठाण्यातील ५० नगरसेवकांचा पाठिंबा आहे. तसेच काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला नगरसेवकांचा विरोध असल्याची असल्याची माहिती समोर आली आहे.