केवळ महनीय व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध का?
प्रतिनिधी / बेळगाव
मागील चार दिवसांत शहरात महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमहोदय आणि महनीय व्यक्ती कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच मराठा लाईट इन्फंट्रीच्या कार्यक्रमासाठी वरि÷ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बंद असलेले पथदीप दुरुस्त करून सुरू करण्यात आले हेते. मात्र कार्यक्रम संपताच कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदीप बंद झाले आहेत. त्यामुळे या सुविधा केवळ महनीय व्यक्तींसाठी उपलब्ध केल्या जातात का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डने विद्युत बिलाची रक्कम भरणा न केल्याने पथदिपांचा वीजपुरवठा हेस्कॉमने बंद केला होता. मात्र मराठा लाईट इन्फंट्रीच्या योद्धय़ांचा पुनर्मिलन सोहळा आयोजित केल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांना धारेवर धरून पथदीप सुरू करण्यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱयांना भेटण्याची सूचना केली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी हेस्कॉम अधिकाऱयांची भेट घेऊन पथदीप सुरू करण्याची विनंती केली होती. त्यामुळे दोन दिवसासाठी काही भागातील पथदीप सुरू केले होते. पण कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर लागलीच कॅन्टोन्मेंट परिसरातील सर्वच पथदीपांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरात पुन्हा अंधार पसरला आहे. कॅन्टोन्मेंटच्या वरि÷ अधिकाऱयांसाठी पथदीप सुरू करण्यात आले. पण सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि हेस्कॉमने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नागरी सुविधा केवळ महनीय व्यक्तीपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना पुरविणे आवश्यक आहे. पण महापालिकेचे नेमके उलटे असून केवळ महनीय व्यक्तीपुरते पथदीप सुरू करण्यासाठी धडपड केली जाते. महापालिकेच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच राणी चन्नम्मा चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील पथदीप गेल्या कित्येक महिन्यापासून बंद होते. पथदीपांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. पण याची दखल घेण्याकडे मनपाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला होता. मात्र अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त या रस्त्यावरील पथदीप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. रात्रंदिवस दुरुस्ती करून पथदीप सुरू करण्यात आले. वास्तविक पाहता, या रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. रुग्णालयात जाणारे नागरिक, रुग्णालयात काम करणारे कामगार तसेच कंग्राळी, काकती व इतर गावांना जाणाऱया वाहनधारकांची गर्दी असते. त्यामुळे पथदीप सुरू ठेवणे आवश्यक आहे. पण याकडे मनपाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. सध्या कार्यक्रमानिमित्त पथदीप सुरू करण्यात आले असून अशाचप्रकारे पथदीप सुरू ठेवण्यात यावेत. नागरी सुविधा केवळ महनीय व्यक्तीपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना पुरविणे आवश्यक आहे. पण महापालिकेचे नेमके उलटे असून केवळ महनीय व्यक्तीपुरते पथदीप सुरू करण्यासाठी धडपड केली जाते. महापालिकेच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.