केरळ-तामिळनाडू सीमेवर झालेल्या भीषण अपघातात सबरीमलाई येथून परतणाऱ्या 8 अय्यप्पास्वामी भक्तांचा मृत्यू झाला आहे.
थेली जिल्ह्यातील कुमिली भागात कार दरीत कोसळली. त्यात 10 जण प्रवास करत होते. दाट धुक्यामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळाली. रस्ता साफ दिसत नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.