मार्चअखेरमुळे काम होते बंद : कामाच्या नियोजनासाठी अधिकारी वर्ग धावपळीत
प्रतिनिधी /बेळगाव
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग योजना मार्च महिनाअखेर बंद ठेवण्यात आली होती. आता त्या कामांना पुन्हा चालना देण्यात आली आहे. यावषी कोटय़वधी रुपयांची कामे राबविण्यात आली आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सुरू होणाऱया कामांना चालना देण्यासाठी अधिकारी वर्ग धावपळीत गुंतल्याचे दिसून येत आहे. गतवषी देण्यात आलेल्या अपेक्षेहून अधिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अजूनही कामे राबविण्यासाठी अधिकारी धडपडू लागले आहेत. त्यामुळे यावषीही लवकरात लवकर उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
मार्चअखेर असल्याने तालुक्मयाबरोबरच जिह्यातीलही कामांना स्थगिती देण्यात येते. आता मार्चअखेर संपला असून एप्रिल महिन्यात कामांनाही चालना देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा कामांना सुरुवात झाल्याने कामगार वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येत्या मे महिन्यांपर्यंत उद्योग खात्रीतील कामांना जोरदार सुरुवात करण्यात येणार असून त्यासाठी प्रयत्नही सुरू करण्यात येत आहेत. परिणामी यासाठी अधिकारीवर्ग धडपडू लागला आहे.
विकासाबरोबरच बेरोजगारी दूर करण्यासाठी महत्मा गांधी उद्योग खात्री योजनेला प्रारंभ करण्यात आला. राज्य सरकारने केंद्राकडून मिळणाऱया निधीचा विनियोग करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. या योजनेतून नदी, नाल्यांचा गाळ काढणे याचबरोबर विहिरी खोदाई, तलावांची खोदाई यासह इतर कामे करण्यात आली आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वसामान्य जनतेलाही उद्योग मिळणे हा उद्देश जरी असला तरी यामधून विकास होत आहे. तरीदेखील मागील काही दिवसांपासून काम बंद असल्याने अनेकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तर मार्चअखेर संपल्याने आता पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काही ठिकाणची कामे संपल्याने पुन्हा कामांची मागणी
विविध विभागातून ही कामे पूर्ण झाली तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. त्याला प्रतिसादही मोठय़ा प्रमाणात मिळू लागला आहे. मध्यंतरी मार्चअखेर असल्यामुळे काही काळ या कामांना स्थगिती देण्यात आली होती. तालुक्मयात सध्या विविध गावांतील कामे राबविण्यात आली असून उर्वरित कामांचे आराखडे तयार करण्यात ग्राम पंचायत विकास अधिकारी गुंतले आहेत. काही ठिकाणी तरी गावातील विविध कामे पूर्ण झाली असून त्यांना पुन्हा कोणते काम द्यायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर काही ठिकाणे कामे द्या, अशी मागणी जोर धरु लागली आहे.