नवी दिल्ली
प्रशांत भूषण तसेच तरुण तेजपाल यांच्या विरोधात 2009 मध्ये न्यायप्रणालीच्या विरोधात केलेल्या टिप्पणीप्रकरणी सुरू असलेला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला आहे. न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, सूर्यकांत आणि एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण आणि तेजपाल यांनी माफी मागितल्याची माहिती वरिष्ठ अधिवक्ते कपिल सिब्बल यांनी दिल्यावर हा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2009 मध्ये एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत भूषण अन् तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवर कथितपणे आरोप केले होते. तेजपाल तेव्हा एका नियतकालिकाचे संपादक होते.