वार्ताहर /हरमल
येथील भोम पठारी भागांत वाळलेल्या गवत व झाडांना आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, भोम भागातील हरमलचे बागायतदार संतोष नाईक यांच्या बागायतीचे अतोनात नुकसान झाले.
काल सकाळी 8च्या सुमारास भोम आंब्याचे पाणी बागायतीत आग लागल्याने संतोष नाईक व अन्य बागायतदाराचे काजू, आंबा आदी मिळून 400 पेक्षा अधिक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पेडणे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी आग आटोक्मयात आणण्यास यश मिळवले.
दरम्यान, वीजतारां एकमेकांना घासल्याने स्पार्किंग होऊन सुक्या गवताला आग लागल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. काजू हंगामाच्या प्रारंभी आग लागण्याही घटना घडल्याने शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याची भरपाई त्वरित देण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे.