डॉ. श्वेता खांडेपारकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
मोतीबिंदू जागृती महिना जगभर सुरू आहे. गोव्यातही त्यासंदर्भात माहिती मार्गदर्शन करणाऱया जागृती कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन झाले. लोकांना मोतीबिंदूचं गांभीर्य कळावं व या लोकशिक्षणाद्वारे त्यांनी डोळय़ांची निगा सांभाळावी हा या मोहिमेचा हेतू असून उद्या गुरुवार 30 जून रोजी मोहिमेची सांगता होणार आहे.
फोंडय़ाच्या नेत्ररोगतज्ञ व शल्यविशारद डॉ श्व्ा्रsता खांडेपारकर यांनी या जागृती मोहिमेची माहिती देताना सांगितले की देशात दरवषी तीन ते चार लाख नवीन मोतीबिंदूचे रूग्ण सांपडतात. मोतीबिंदू हे दृश्टीहिनतेचे मुख्य कारण आहे. मोतीबिंदूमुळे सुमारे 1 कोटी लोकांची एका व काहींची दोन्ही डोळय़ांची दृष्टी गेलेली आहे.
सुमारे 17 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया आमच्या देशात दरवषी होतात. जुन्या केसीस पूर्णतः बऱया करण्यासाठी 50 ते 60 लाख शस्त्रक्रिया होण्याची गरज एका सर्वेक्षणात दिसून आली होती. शल्यविशारद डॉक्टरांचा अभाव असेल वा इतर सुविधांचा अभाव असेल पण मोतीबिंदू रूग्णांचा आंकडा सद्या वाढलाय ही वस्तुस्थिती समजून डोळय़ांच्या डॉक्टरांनी ही जागृती विविध स्तरांवर चालवली असं डॉ खांडेपारकर यांनी सांगितलं.
मोतीबिंदू म्हणजे नेमके काय?
आमच्या डोळय़ांत एक लेन्स असते. बाहेरून येणारी प्रकाशकिरणे ही लेन्स वाकवते व डोळय़ांच्या पडद्यावर केंद्रीत करते. म्हणून आम्हाला बाहेरचं जग स्पष्ट दिसते. वयाप्रमाणे वा इतर कारणाने या लॅन्सची पारदर्शकता कमी होते. हळूहळू संपूर्ण लॅन्स व्यापत तिला अपारदर्शी बनवते. याला मोतीबिंदू म्हणतात, असे डॉ श्वेता खांडेपारकर यांनी सांगितलं.
मधुमेहीनी काळजी घ्यावी
दृष्टी धूसर होणं, धुक्मयासारखं संदिग्ध दिसणं ही मोतीबिंदूची प्राथमिक लक्षणे. लहान सूक्ष्म वस्तू या रूग्णांना दिसत नाहीत. दुर्लक्ष केलं व तपासणी- निदान झालं नाही तर संपूर्ण लॅन्स ओपेक होऊ शकते व तो डोळा निकामी होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. साधारणपणे 45 वयोमर्यादा ओलांडली की कुणालाही मोतीबिंदू होऊ शकतो. मधुमेहामुळे 30 ते 40 या वयातही मोतीबिंदू होऊ शकतो. मधुमेह रूग्णांनी रक्तातील साखर नियमितपणे नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे.
कृत्रिम लॅन्स बसवणे हाच उपाय
डोळय़ांना अपघाती इजा होणे, विजेचा धक्का बसणे, अथवा जे भट्टीजवळ गरम वातावरणात धोकादायक काम करतात, रेडिएशनचं उत्सर्जन होतं तिथं काम करतात त्यामुळे त्याना मोतीबिंदू होण्याची शक्मयता असते. सोरायसीस, संधीवात व तत्सम इतर आजार असलेल्या रूग्णांनाही मोतीबिंदू होण्याची शक्मयता असते,. शस्त्रक्रियेद्वारे मोतीबिंदू काढून तिथं कृत्रिम लॅन्स बसवणं हा त्यावर एकमेव पर्याय आहे. मोतीबिंदू फुटला तर शस्त्रक्रियेद्वारे तो काढावाच लागतो पण अशा प्रसंगी गेलेली दृष्टी परत येईल याची खात्री नसते.