भात तरु, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकरीवर्ग चिंताग्रस्त
वार्ताहर /जांबोटी
ओलमणी-दारोळी परिसरात गव्यांच्या उपद्रवामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांच्याकडून भातरोप लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या भात तऊचे तसेच शेतवडीतील ऊसपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. तरी वनखात्याने त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ओलमणी-दारोळी परिसरातील शेतवडीमध्ये गव्यांच्या धुमाकूळमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या भात तसेच ऊस, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. ओलमणी-दारोळी गावादरम्यान असलेल्या जंगलात तसेच मलप्रभा नदीतीरावर सध्या गव्यांच्या कळपांचे मोठ्याप्रमाणात वास्तव्य आहे. साधारणपणे एका कळपामध्ये दहा ते बारा गव्यांचा समावेश आहे. या भागातील शेतकरी वर्गाने जून महिन्यात भातरोपांच्या तऊची पेरणी केली आहे. सध्या भातरोप लागवडीयोग्य बनली आहेत. मात्र चालूवषी मान्सूनचे उशीराने आगमन झाल्यामुळे भात रोपलागवडीसाठी शेतवडीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध नसल्याने रोपलागवड लांबणीवर पडली आहे. मात्र गव्यांच्या कळपानी आपले लक्ष भात तऊकडे वळविले असून त्यांच्याकडून लागवडीयोग्य बनलेले शेतवडीतील भात तरू फस्त करण्यात येत असल्यामुळे शेतकरी वर्गाची झोपच उडाली आहे. तसेच भात तरू तुडवून फस्त करीत असल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल बनला आहे. गव्यांच्या या उपद्रवामुळे या भागात भातरोपांच्या तऊचा तुटवडा भासण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
वनपालांनी गव्यांच्या कळपांचा त्वरित बंदोबस्त करावा
सध्या या परिसरात गव्यांबरोबरच रानडुकरे, माकड, हरीण आदी जंगली प्राण्यांच्या उपद्रवांमध्ये देखील वाढ झाली असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरूच आहे. काबाडकष्ट करून काढलेली पिके जंगली प्राणी काही क्षणातच फस्त करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. मात्र वनखात्याकडून तुटपुंज्या नुकसानभरपाईवर शेतकरी वर्गाची भलावण करण्यात येत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. तरी जांबोटी उप वनविभागाच्या वनपालांनी लक्ष घालून ओलमणी,, दारोळी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या गव्यांच्या कळपांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.