महापालिकेकडून कोणत्याच उपाययोजना हाती घेतल्या नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध भागांत साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे. दक्षिण भागात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महापालिकेकडून केवळ गटार स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. डेंग्यूसारख्या आजाराचा फैलाव होऊ नये, यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना हाती घेण्यात आल्या नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
शहरात पावसाचा जोर वाढला असून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे साथीच्या आजाराचे प्रमाणदेखील वाढले आहे. सर्दी, ताप, खोकला आणि विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे मजगाव, अनगोळ, खासबाग अशा विविध भागात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात निदर्शनास आली आहे. खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेतले जात आहेत. पण याबाबतची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. शक्मयतो खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱयांची संख्या जास्त असल्याने सरकारी रुग्णालयात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या उपलब्ध होत नाही. सध्या दक्षिण भागात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
रोगराईचा फैलाव रोखण्याच्यादृष्टीने व जागृती मोहीम राबविण्याच्यादृष्टीने महापालिकेकडून कोणत्याच उपाययोजना हाती घेण्यात आल्या नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. अनगोळ, मजगाव अशा विविध उपनगरांमध्ये तापाने त्रस्त असल्याचे रुग्ण दिसून येत आहेत. त्यामुळे मनपाच्यावतीने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
शहराच्या काही भागात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या आढळून आली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, प्रतिबंधक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच जागृतीदेखील करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. डुमगोळ यांनी दिली.