जायंट्स सहेलीतर्फे उद्यानाची स्वच्छता
बेळगावः जायंट्स प्राईड सहेलीतर्फे गोवावेस सर्कलमधील बसवेश्वर गार्डन स्वच्छ करण्यात आली. खराब झालेल्या व कीड लागलेल्या झाडांच्या फांद्या छाटून खत घालण्यात आले. काही रोपे लावण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षा आरती शहा, सचिव जिग्ना शहा व अन्य सदस्या उपस्थित होत्या. जंगल वाचविणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे, असे मत आरती शहा यांनी व्यक्त केले.
युवा सेनेतर्फे वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युवा सेनेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. बेळगाव परिसरात विविध फळ व फूल झाडे लावण्यात आली. कोरोनाकाळात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय काम केले, तसेच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना साहाय्य केले, अशा सर्व व्यक्तींना रोपे देऊन सन्मान करण्यात
आला.
तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची भेट घेऊन या युवकांनी त्यांनाही रोपटे दिले. यावेळी विनायक हुलजी, वैभव कामत, महेश मजुकर, विजय मोहिते, स्वांत तवनशेट्टी, आदित्य तिरवीर व चंदन यासह इतर सदस्य उपस्थित होते.
कॅथॉलिक असोसिएशन
कॅम्प येथील कॅथॉलिक असोसिएशन ऑफ बेळगाव यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 1 हजारहून अधिक रोपे बेळगाव परिसरात लावण्यात आली. बेळगावचे बिशप रेव्ह. डेरेक फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. निसर्गसंपदेने भरपूर काही आपल्याला दिले आहे. परंतु ते आपल्याला नष्ट करून चालणार नाही, तर पुढील पिढय़ांपर्यंत ते उपयोगासाठी ठेवावे लागणार आहे, असे बिशप फर्नांडिस यांनी सांगितले. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा लारा फर्नांडिस यासह इतर सदस्य उपस्थित होते.
आराधना विशेष मुलांची शाळा
सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत सोमवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी विद्यार्थ्यांना
हवेतील वाढते प्रदूषण रोखण्याच्या कामी वृक्षांचे संवर्धन व पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी विविध प्रकारची रोपटी विद्यार्थ्यांच्या हस्ते लावण्यात आली. शाळेचे शिक्षक रशीद भाई, एम. पी. कुंभार, द्वारकाताई पाटील, अश्विनी पवार, किशोरी जुवेकर, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजमध्ये नुकताच जागतिक पर्यावरण दिन झाडे लावून साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव ज्ञानेश कलघटगी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक प्रा. व्ही. पी. महाजन यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य एम. बी. हुंदरे यांनी गुलाबपुष्प देऊन केले. प्राचार्यांचे स्वागत एस. एस. नाझरे यांनी केले. या सर्वांच्या व विद्यार्थिनींच्या हस्ते झाडे लावून रोपटय़ांना पाणी घालण्यात आले. ज्ञानेश कलघटगी यांनी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे व ते जगविले पाहिजे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होते. पाऊस अधिक पडतो. आपल्याला निसर्गामुळे स्वच्छ हवा मिळते, असे सांगितले.
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्राचार्य एम. बी. हुंदरे, प्रा. व्ही. पी. महाजन, प्रा. के. ए. हगिदळे, प्रा. प्रशांत सुभेदार, प्रा. एस. एन. गोल्याळकर, एस. एस. नाझरे, कल्लाप्पा परसण्णावर व प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
एबीव्हीपीतर्फे वृक्षारोपण
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. हनुमाननगर येथील सरकारी शाळेच्या आवारात रविवारी रोपलागवड करण्यात आली. वृक्षमित्र अभियानांतर्गत राज्यभर 10 लाखांहून अधिक रोपांची लागवड होणार आहे. या अभियानाला रविवारी प्रारंभ झाला.
वृक्षांची संख्या वाढून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध संघ-संस्था, स्वयंसेवी संघ प्रयत्न करत आहेत. वनखात्याने विविध उपक्रम राबविले आहेत.
परिषदेतर्फे 10 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यावेळी पृथ्वीकुमार, डॉ. आनंद होसूर, गोरबाळी, सुरेश गोणी, रोहीत हुमनाबादीमठ उपस्थित होते.
बागायत खात्यातर्फे
बागायत खात्यातर्फे मनरेगांतर्गत विविध ठिकाणी पर्यावरण दिनादिवशी रोपे लावण्यात आली. बागायत खात्याचे वरि÷ उपसंचालक किरणकुमार उपाळे, बेळगाव हॉर्टिकल्चर सोसायटीचे सचिव वर्धमान लेंगडे व साहाय्यक संचालक लक्ष्मण यड्रावी, शिवानंद हिरेमठ आणि ट्रेनिंग सेंटरचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
जायंट्सतर्फे वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) च्यावतीने रविवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. मंडोळी येथील डोंगरामध्ये वसलेल्या स्वयंभू बसवाण्णा मंदिराच्या परिसरातील मोकळय़ा जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी पाहुण्या म्हणून मंडोळी ग्रा.पं. अध्यक्षा लक्ष्मी कणबरकर, नगरसेवक सारंग नागोजीचे व अध्यक्ष म्हणून जायंट्सचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ उपस्थित होते.
याप्रसंगी हिरेमठ म्हणाले, वारेमाप जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला असून निसर्गाशी माणसाचे असलेले पूर्वापार संबंध बिघडत चालले आहेत. समस्त सजीवसृष्टीचे जगणे सुंदर आणि समृद्ध व्हावयाचे असेल तर प्रत्येक मनुष्याने पर्यावरणाला महत्त्व देणे गरजेचे आहे.
सारंग नागोजीचे यांनीही वृक्षारोपणाचे महत्त्व कथन केले. संचालक एस. सुरेश यांचेही भाषण झाले. याप्रसंगी मंडोळी, चन्नम्मानगर परिसरातील नागरिक व जायंट्सचे सदस्य उपस्थित होते. सचिन महागावकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
खानापुरात सामाजिक वनीकरण खात्याकडून वृक्षारोपण
1 लाख वृक्ष लागवडीचे ध्येय : 1 लाख काजू रोपांचे मोफत वितरण
खानापूर : पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण खात्याकडून खानापूर तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यात 1 लाख वृक्षारोपण करण्याचे तसेच 1 लाख काजू रोप वितरण करण्याचे ध्येय असल्याचे सामाजिक वनीकरण खात्याचे व्ही. एन. डुमगोळ यांनी सांगितले.
पर्यावरण दिनानिमित्त चापगाव ते जळगा या सहा कि. मी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. शिंदोळी मराठी शाळेच्या आवारात तसेच हंदूर कन्नड शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वनीकरण निगम मंडळाचे सदस्य सुरेश देसाई, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, विठ्ठल हलगेकर, गुंडू तोपिनकट्टी, राजू पाटील उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण खात्याच्यावतीने तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्याच्या बाजूने वनीकरणाचे काम हाती घेण्यात येते. यावर्षी 1 लाख रोपांचे वितरण व रोपण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कडुलिंब, तपसी, फणस, आंबा, काजू, पिंपळ, महोगणी, करंजी यासह अनेक जातींचे रोप उपलब्ध आहेत. यावर्षी सामाजिक वनीकरण खात्याच्यावतीने मोफत 1 लाख उत्तम प्रतीच्या काजू रोपांचे वाटप करण्यात येणार आहेत. शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. इतर जातींचीही 1 लाख रोपे लावण्यात येणार आहेत. यावेळी एस. के. खोत, एच. ए. शेख, शिवलिंगप्पा इंगळगी, इरण्णा करलिंगन्नावर, के. के. सिपकर, महांतेश कुलकर्णी, अमर कुलकर्णी उपस्थित होते.