पटोलेंचे आरोप बिनबुडाचे : प्रवीण दरेकर
ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी २० तारखेला मतदान होणार आहे. परंतु मतदानाआधी भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यात पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. मतदानासाठ केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील आमदारांवर दबाव टाकण्यासाठी फोन करत आहे असा आरोप पटोले यांनी म्हटकेला आहे. याबाबत सगळी माहिती आमच्याकडे आहे. वेळ आली की ही माहिती समोर आणू, असं नाना पटोले म्हणाले. भाजपने कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमदारांवर मतदानासाठी दबाव आणत आहे. योग्य वेळ आल्यावर जनतेसमोर या गोष्टी मांडू. आमच्या हाती आलेल्या रेकॉर्डनुसार ईडी आणि सीबीआय यांचा दुरुपयोग कसा सुरु आहे हे निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला समजत आहे. भाजप सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करत आहे. ही लोकशाहीसाठी घातक आहे.
यासर्व प्रकारावर कायदेशीर कारवाई करण्याविषयी विचारलं असता पटोले यांनी सुप्रीम कोर्टाचे न्यायामूर्ती मीडियासमोर येऊन न्याय मागत आहेत, यावरुन काय परिस्थिती आहे याचा अंदाज येऊ शकतो. आम्ही जनतेच्या दरबारातच ही गोष्ट घेऊन जाऊ. हे लोक सत्तेचा कसा गैरवापर करतात हे त्यांच्यासमोर मांडू.” असे ते म्हणाले.
पटोलेंचे आरोप बिनबुडाचे : प्रवीण दरेकर
नाना पटोलेंच्याआरोपावर परवीन द्रेकरांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी पटोलेंचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हंटले आहे. तसेच हातात काही पुरावे नसताना केवळ बोलायचं, बोलाचीच कढी, बोलाचीच भात अशी या नेत्यांची वक्तव्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांना ना आम्ही गांभीर्याने घेत ना आमदार, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षेनेत प्रवीण दरेकर यांनी दिलीय.