जिल्हाप्रमुखपदी प्रताप जाधव, सचिन मोहिते यांची नियुक्ती
प्रतिनिधी/ सातारा
राज्यात शिवसेनेमध्ये बंड झाल्याने मुळच्या ठाकरे गटात अजूनही जे निष्ठेने आहेत त्यांना पदोन्नती किंवा आहे त्याच पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. मातोश्रीवरुन परवाच सातारा जिह्यातील ठाकरे गटाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिह्यात ठाकरे गटात चैतन्य निर्माण झाले आहे. जिल्हा प्रमुख म्हणून तळमळीचे धडाडीचे शिवसैनिक प्रताप जाधव आणि सचिन मोहिते यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटातून जे जे शिंदे गटाशी संपर्कात होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना पदावर काढून टाकण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नव्याने निवडी मातोश्रीवरुन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा संघटक म्हणून यशवंत घाडगे, जिल्हाप्रमुख म्हणून सचिन मोहिते (सातारा, वाई, फलटण), प्रताप जाधव (कोरेगाव-माण), उपजिल्हा प्रमुख म्हणून दत्तात्रय नलावडे (कोरेगाव विधानसभा), वाई विधानसभा संघटक म्हणून नंदकुमार घाडगे, सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे, वाई तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील (मारुल हवेली, हेळवाक, तारळे, म्हावशी), सचिन आचरे (कुंभारगाव, मंद्रूळकोळे, मल्हारपेठ, सुपने), पाटण तालुका संघटक सचिन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रताप जाधव यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने गाजवली आहे. सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरुन न्यायहक्कासाठी लढा दिला. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी उमेदीचा काळ घालवला. अनेक आंदोलनाच्या केसेस झाल्या. तरीही त्यांनी खंबीरपणे शेवटपर्यंत शिवसेनेतच राहिले आहेत. त्यांनी आमदार महेश शिंदेच्या घरावर नोटीस बजावली होती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निषेधार्थ साताऱयात मोर्चा काढण्यात अग्रभागी होते. तसेच सचिन मोहिते यांच्याकडे उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यांनीही सातारा शहर व तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न तडीस नेले. महावितरण कंपनीतील ठेकेदाराचा भ्रष्टाचाराचे प्रकरण तडीस नेले. मोबाईल कंपन्यांकडून होत असलेली लुटीचा प्रश्न शेवटपर्यंत नेला. रस्त्याच्या चुकीच्या कामावर आवाज उठवला. पालिकेच्या अतिक्रमणावरुन आक्रमक आंदोलने केली, त्यांनीही शेवटपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी राहिले. शिवसेनेमध्ये नव्या कार्यकर्त्यांना उभे करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावरही मातोश्रीकडून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्याचे तालुकाप्रमुख असताना शिवसेनेचे कार्य निष्ठेने पार पाडणारे दत्ताभाऊ नलावडे यांच्यावर उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.