सावंतवाडी / प्रतिनिधी-
चांदा ते बांदा योजनेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. या योजनेत भ्रष्टाचार झाला असेल ,तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उघड करावाच असे आव्हान शिंदे गटाचे आणि या योजनेचे माजी सदस्य राजन पोकळे यांनी दिले आहे. रुपेश राउळ यांना शासनाच्या निधीबाबत माहिती नाही. कोणत्याही खाली कुठला निधी खर्च होतो याची त्यांनी माहिती घ्यावी. चांदा ते बांदा योजनेचा मी सदस्य होतो. त्यामुळे या योजनेत कुठे निधी खर्च झाला याची मला कल्पना आहे. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. रूपेश राऊळ शिवसेनेत होते. दीपक भाई बरोबर ही काम करत होते. त्यावेळी त्याना पटाचारा ची आठवण झाली नाही. आता त्यांना या योजनेत भ्रष्टाचार दिसू लागला. वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी ते अशी बालिश वक्तव्य करीत आहेत असे पोकळे यांनी स्पष्ट केले