ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात परतीच्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले सोयाबीन, कापूस पीक पावसामुळे खराब झालं आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगाबाद दौऱ्यावर असून ते येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या या पाहणी दौऱ्यावर शिंदे गटाचे आमदार मंत्री अब्दुल सत्तर (Abdul Sattar) यांनी टीका केली आहे. तर या टीकेला चंद्रकांत खौरे (Chandrakant Khaire) यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. (aurangabad chandrakant khaire criticizes abdul sattar over uddhav thackeray visit to aurangabad)
उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केलीय. उद्धव ठाकरे २४ मिनिटांत नुकसानीची कशी पाहणी करणार अशी खोचक टीका सत्तार यांनी केली. अदरम्यान सत्तारांच्या याच टीकेला ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खौरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. सत्तार यांची सगळी लफडी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, असे खैरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या स्टॉलला भीषण आग; २ ठार
“राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी किती ठिकाणी पाहणी केली याचे उत्तर अब्दुल सत्तार यांनी आधी द्यावे. राज्यात एवढा मोठा पाऊस पडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच गुंग आहेत. सत्तार म्हणतात मी ६९ ठिकणी जाऊन आलो, पण जाऊन काय करून आलेत. तिथे जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असे सांगतायत. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच निवडून आले आहेत हे सत्तार यांनी विसरू नयेत” अशी टीका चंद्रकात खैरे यांनी केली.
पुढे खैरे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे काम हे सत्ताधाऱ्यांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरावे. तुम्ही ५० खोके आमदारांना देता. मग शेतकऱ्यांना एखादी पेटीतरी द्या. शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. सगळे आपापल्या धुंदीत आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरे बाहेर पडले आहेत,” अशी घणाघाती टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
“त्यांच्या (उद्धव ठाकरे) हाताखाली तुम्ही (अब्दुल सत्तार) काम केलेलं आहे. तुम्ही त्यांच्यामुळेच निवडून आलेले आहात, हे विसरू नका. तुम्ही माझ्या पाया पडले, त्यांच्या पाया पडले. मला कसंही करून निवडून आणा. खैरे साहेबांना बरोबर घ्या, असे सत्तार म्हणाले होते. मी गेलो म्हणून ते निवडून आले. पण आता त्यांना मस्ती आली आहे. ते सगळीकडे फिरत असतात. कधी इकडे, कधी तिकडे. आता आजून कोणत्या पक्षात जातील सांगता येत नाही. त्यामुळे त्यानी थोडं थांबावं. आम्ही करतो त्यांचा बंदोबस्त. त्यांची अनेक लफडी माझ्याकडे आली आहेत. अब्दुल सत्तारसारखा माणूस उद्धव ठाकरेंवर टीका करतो. त्यांना हे कळत नाही, की आपण उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम केले आहे. त्याचा समाचार आम्ही घेऊ,” अशी कठोर टीका खैरे यांनी केली.