ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई: ओबीसींना आरक्षण न देता निवडणूका होऊ नये म्हणून नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच निवडणूका पुढे ढकल्याने येणाऱ्या निवडणूकीत तरी ओबीसींचा प्रश्न मार्गी लागणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर (State Government) नाराजी व्यक्त केली.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, पवार हे नाव मराठा समाजामध्ये आहे. इतर समाजामध्येही हे नाव आहे. काही आडनावं अनेक समाजात आहेत. जसं की जाधव, शेलार, गायकवाड, होळकर ही नाव माळी, मराठा,दलित समाजात आहेत. ओबीसी समाजातही अशी अनेक नावे आहेत. त्यामुळे आडनावावरुन जात ओळखणं कठीण आहे.यासाठी गावागावात जाऊन सर्वे करावा लागणार आहे. इंग्रजांनी जी जनगणना केली त्यानंतर ओबीसींच्या टक्केवारीचा आकडा ठरला होता. मात्र आता परत जनगणना करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायती आडनावं तपासून डेटा गोळा करतील अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा- ‘मविआ’तील दुफळीचा भाजपला फायदा होणार-चंद्रकांत पाटील
पुढे बोलताना ते म्हणाले, ओबीसींच्या संघटनेने आपापल्या गावात लक्ष देणं गरजेचं आहे असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीसांच्याही संघटना आहेत त्यांनाही यात लक्ष घालावे असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. खरंतर जनगणना करणे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. मात्र त्यांनी राज्य सरकारवर याची जबाबदारी दिली आहे. यासाठी आयोगानं योग्य पध्दतीनं काम करण्याची गरज आहे. जर योग्य प्रकारे डेटा जर गोळा केला नाही तर ओबीसींच नुकसान होऊ शकते असेही ते म्हणाले.