म्हापसा : जुलमी मोगलांच्या राजवटीचा नाश होऊन हिंदवी स्वराजच स्थापन व्हावे. देशातील देवातांची मंदिरे सुरक्षित असावी आया बहिणींची अब्रू शाबीत राहावी यासाठी हिंदूंची राजवट देशात यावी ही संकल्पना जिजाऊची त्यांनी गीता, रामायण, महाभारतातील कथाच्या आधारे बाल शिवाजींच्या मनात स्वराज्य स्थापनेची कल्पना ऊजवली. म्हणूनच कोवळ्या शिवराय हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून मावळ मराठ्यांच्या सहकार्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून छत्रपती झाला. या देशाचे आराध्य दैवत असलेल्या महाराज्यांच्या धाडशी, पराक्रमी आणि शौर्याची गाथा तऊण आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहचायला हवी. अशी इच्छा गोमंतकातील प्रसिद्ध चित्रकार तसेच शिवसेनेचे माजी प्रदेश अध्यक्ष संजय हरमलकर यानी व्यक्त केली. यावेळी म्हापसा हुतात्मा चौकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वाऊड पुतळ्याजवळ बार्देश तालुका छत्रपती शिवाजी समारोह समिती आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्यक्ते या नात्याने संजय हरमलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, खास अतिथी अँड. परेश राव, अध्यक्ष डॉ. गुरूदास नाटेकर, सचिव प्रा. रवींद्र फोगेरी, सह सचिव प्रकाश धुमाळ, खजिनादार विश्वास नागवेकर, उपाध्यक्ष शंभु भाऊ बांदेकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, एकनाथ नागवेकर, गोविंद शिरोडकर इत्यादी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना संजय हरमलकर म्हणाले की पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचे धाडसी पराक्रमांचा त्यांच्या गुणांचा समावेश असावा. जिजाऊ मातेने शिवाजी कसा घडवला याची माहिती हवी. जीवास जीव देणारा शूरवीर निष्ठावान मावळ्यांच्या शौर्य कथा हव्यात. मोंगल सरदारांना नाहक मोठे करून दाखवत आहे. घरोघरी शिवराय पोहचायला हवे. असे सांगून ते पुढे म्हणाले की महाराजांच्या जयंतीचा कार्य मोठ्याप्रमाणात होऊन त्यात बार्देश मधील विद्यार्थि, पालक शिक्षक सहभागी व्हावेत. शिवाजी महाराजांचा आश्वाऊड पुतळा म्हापश्यात व्हावा ही आपली संकल्पना होती. हा पुतळा आपण स्वत: बनवावा अशी इच्छा मुख्यमंत्री मनोहर परीकराकडे उक्त केली होती. परंतु आपल्याला डालवून या छोट्या जागेत पुतळा उभारल्याची खंत व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ म्हणाल्या की पराक्रमी पुत्र असा असावा तर तो शिवरायणसारखा तर मुलांचे व्यक्ती महत्व आई कशी असावी तर ती जिजाबाई सारखी. यांच्या जीवनाची प्रेरणा होऊनच आपण वाटचाल करावी असे त्या म्हणाल्या.
सुरवातीस नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यानी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व इतरांनी पुष्पा?जली वाहिली. स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. गुरूदास नाटेकर यानी केले. अँड. परेश राव यावेळी म्हणाले की शिवाजी महाराज हे देश प्रेमाचे प्रतीक होते. त्यांचा प्रकाराम घराघरात पोचावा. या वेळी सरकारी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी शिवारायांचा पाळणा सादर केला तर ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या मुलांनी पवाडा सादार करून कार्यक्रमास उभारी दिली. त्यामुळे शिक्षिका सुफल पेडणेकर, निशा नमशिकर, अनुष्का सावंत, वैशाली डोंगरे, प्रसाद चिखलीकर यांचा सन्मान करण्यात आला. एकनाथ नागवेकर यानी घोषणा दिल्या. सुरेंद्र शेट्या? यांनी सूत्रसंचालन तर माजी उपसभापती शंभु भाऊ बांदेकर यांनी आभार प्रदर्शन केले.