आंधप्रदेशात सीबीआयची कारवाई ः मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी अडचणीत
@ वृत्तसंस्था /कडप्पा
आंध्रप्रदेशचे माजी मंत्री वाय.एस. विवेकानंद रेड्डी यांची 2019 मध्ये हत्या झाली होती. याहत्येप्रकरणी सीबीआयने रविवारी त्यांच बंधू वाय.एस. भास्कर रेड्डी यांना अटक केली आहे. भास्कर रेड्डी हे कडप्पाचे खासदार वाय.एस. अविनाश रेड्डी यांचे पिता आणि मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचे काका आहेत. राजकीय घराण्यातील अंतर्गत कलह या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. आंध्रप्रदेशच्या राजकारणात मातब्बर घराणे मानल्या जाणाऱया रेड्डी कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला या हत्येप्रकरणामुळे धक्का पोहोचला आहे.
सीबीआयच्या विशेष तपास पथकाने भास्कर रेड्डी यांना कडप्पा जिल्हय़ातीर पुलिवेंदुला येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. सीबीआय अधिकाऱयांनी भास्कर रेड्डीच्या कुटुंबीयांना अटकेशी संबधित दस्तऐवज दर्शवून ही कारवाई केली आहे. या कारवाईवेळी अविनाश रेड्डी यांचे समर्थक मोठय़ा संख्येत उपस्थित होते.
सीबीआयकडून भास्कर रेड्डी यांना हैदराबाद येथे आणले गेले असून तेथील न्यायदंडाधिकाऱयांसमोर त्यांना रविवारी संध्याकाळी हजर करण्यात आले. भास्कर रेड्डी यांच्यावरील ही कारवाई खासदार अविनाश रेड्डी यांचे निकटवर्तीय जी. उदयकुमार रेड्डी यांना अटक झाल्याच्या दोन दिवसांनी झाली आहे. मागील काही महिन्यांपासून सीबीआयकडून आरोपींची अनेकदा चौकशी करण्यात आली होती. जी. उदयकुमार रेड्डी यांना अटक करत सीबीआय न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, ज्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
माजी खासदाराची हत्या
माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे बंधू आणि आंध्रप्रदेशचे वर्तमान मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचे काका विवेकानंद रेड्डी यांची निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 15 मार्च 2019 रोजी रात्री कडप्पा जिल्हय़ातील पुलिवेंदुला येथील निवासस्थानीच हत्या करण्यात आली होती. 68 वर्षीय माजी मंत्री आणि माजी खासदार तेव्हा घरात एकटेच होते. अज्ञात लोकांनी घरात शिरून त्यांची हत्या केली होती. विवेकानंद रेड्डी यांच्या कन्या सुनीता रेड्डी यांच्या याचिकेवर सुनावणी करत आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने 2020 मध्ये सीबीआय चौकशीचा निर्देश दिला होता. सुनीता रेड्डी यांनी काही नातेवाईकांवरच वडिलांच्या हत्येप्रकरणी संशय व्यक्त केला होता.
सुनावणी हैदराबादमध्ये स्थानांतरित
सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाची सुनावणी हैदराबादमध्ये स्थानांतरित केली होती. आंध्रप्रदेशात निष्पक्ष सुनावणी आणि चौकशीविषयी सुनीता रेड्डी यांनी व्यक्त केलेला संशय योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येत त्यांचे बंधू भास्कर रेड्डी अन् खासदार अविनाश रेड्डी यांचा हात असल्याचा आरोप आहे. तर मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू अविनाश यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत.