प्रतिनिधी /पणजी
रविवारी पहाटे पडलेल्या दिड इंच पावसात बांबोळी येथील कुजिरा शाळा संकुलाकडे जाणाऱया भुयारी मार्गात पाणी साचल्याने येथे जाणाऱया शाळेय मुलांचे, पालकांचे हाल झाले. अजून नियमित पावसाळा सुरू व्हायचा आहे तेव्हा या भुयारी मार्गातील पाण्याचे काय होणार ? शाळेय मुले पालकांची वाहने तेथून कशी जाणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या भुयारी मार्गात तुंबणाऱया पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे समोर आले आहे.
कुजिरा शाळा संकुलात मुलांना, पालकांना जाण्यास, येण्यास सोयीचे होते म्हणून भुयारी मार्गाचा वापर केला जातो. तो खड्डेमय झाला होता म्हणून तो दुरूस्त करून चकाचक करण्यात आला परंतु तेथे साचणाऱया पाण्यावर मात्र कोणताच उतारा सरकारने केलेला नाही. त्यामुळे मुलांचे, पालकांचे हाल झाले आहेत. पावसापूर्वी जर पाणी निचरा होण्याची सोय केली नाही तर पावसाळय़ात मुलांचे, पालकांचे हाल ठरलेले आहेत म्हणून पावसाळय़ापुर्वी पाणी निचरासाठी उपाययोजना करा अशी मागणी होत आहे.