Chinder village village from 18; The village deity gave Kaul
बहुचर्चित असलेली चिंदर गावची गावपळण शुक्रवार १८नोव्हेबर पासून सुरू होत आहे.मंगळवारी सकाळी ग्रामदेवता रवळनाथाने कौल दिल्याने चिंदर गावची गावपळण १८पासून होणार असल्याची माहिती चिंदरगावचे मानकरी आणि पोलीस पाटील दिनेश पाताडे ,भाई तावडे यांनी दिली.सुमारे चार ते पाच हजार वस्तीच्या या गावात प्राचीन काळापासून दर तीन ते पाच वर्षांनी गावपळणीची प्रथा पाळली जात आहे.मागिल काळात २०१८साली गावपण झाली होती.यंदाचे वर्ष गावपळणीचे असल्याने प्रथेप्रमाणे मंगळवारी बारापाच मानकरी जमून श्री देव रवळनाथाला कौल प्रसाद घेतला.देवाचा कौल झाल्यावर तारीख निश्चित करण्यात आली.यामुळे शुक्रवार १८ नोव्हेंबर पासून २१नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण चिंदर गावांतील माणसे तीन दिवस आणि तीन रात्री साठी वेशीबाहेर निसर्गाच्या सानिध्यात वस्ती करून राहणार आहेत.त्यामुळे संपूर्ण चिंदर गाव निर्मनुष्य होणार आहे आणि गजबज वाढणार आहे ती गावच्या वशीबाहेर.यासाठी मुंबई चाकरमानी ही मोठ्या संख्येने या पळणीत सहभागी होतात.
आचरा / प्रतिनिधी