नळपाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प, सर्वच नळपाणी योजना कुचकामी
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या महिन्याभरापासून ठप्प झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जांबोटी हे गाव खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. महसूल विभागाचे मुख्यालय असलेल्या या गावची लोकसंख्या सुमारे 5000 च्या घरात आहे. या गावचे राजवाडा व रामापूर पेठ असे दोन भाग आहेत. मात्र उन्हाळ्यात या गावासाठी पाणीपुरवठ्याचा स्त्राsत उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जांबोटी येथे पाणीपुरवठा करण्यासाठी जलनिर्मल योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन आदी योजनांद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. मात्र यापैकी एकही योजना पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही. परिणामी पाणीपुरवठ्यासाठी खर्च करण्यात आलेल्या शासनाच्या लाखो ऊपयांचा निधी पाण्यातच गेला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मलप्रभा नदीतून जलवाहिन्यांद्वारे पाण्याचा पुरवठा करण्याची योजना आखून जांबोटी बसस्थानक तसेच माध्यमिक विद्यालयाच्या पिछाडीस जलकुंभ उभारून दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र गावासाठी पाणीपुरवठा करण्यात येणारे मलप्रभा नदीचे पात्र मार्च महिन्यापासूनच कोरडे पडते. तसेच जलवाहिन्या फुटणे, विद्युत मोटारीत बिघाड, अनियमित वीजपुरवठा, अयोग्य नियोजन आदी कारणांमुळे देखील नळ पाणीपुरवठ्यात समस्या उद्भवतात. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी हाल होत आहेत. तसेच काही वर्षांपूर्वी सिद्धाच्या डोंगरावरील नैसर्गिक जलस्त्रोत्राद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. त्याद्वारे नागरिकांना काही प्रमाणात पाण्याचा स्त्राsत उपलब्ध होता. परंतु काही दिवसापूर्वी जंगलाला लागलेल्या वणव्यात जलवाहिन्या जळाल्यामुळे सदर पाणीपुरवठा देखील बंद झाला आहे. त्याची दुऊस्ती करण्याकडे ग्राम पंचायतचे दुर्लक्ष झाले आहे.
नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
जांबोटी-राजवाडा येथे थोरली विहीर तसेच चौखांबा मंदिरसमोर असलेली कूपनलिका हे पाणीपुरवठ्याचे पर्यायी स्त्राsत उपलब्ध आहेत. मात्र थोरली विहिरीतून पाणी उपसा करणाऱ्या मोटारीत बिघाड झाल्यामुळे येथील नागरिकांना केवळ कूपनलिकेच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. गावच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने सदर पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. रामापूर पेठ येथे नैसर्गिक स्त्राsताद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. मात्र जलवाहिन्या जळाल्यामुळे तसेच जलस्तोत्रातील पाणी अपुरे पडत असल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला असून नागरिकांना एक-दोन सार्वजनिक कूपनलिका तसेच खासगी विहिरीवरच अवलंबून राहावे लागत आहे. सध्या मार्च महिना सुरू असल्यामुळे सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. शिवाय कूपनलिकांचे पाणीदेखील अपुरे पडत असल्यामुळे खासगी विहीर मालक नागरिकांना पाणी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने जांबोटी येथील दोन्ही गावच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच हॉटेल व इतर व्यावसायिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी लालवाडी ग्रामस्थांचे हाल : महिलांनी काढला ग्रामपंचायतीवर मोर्चा
नंदगड : हेब्बाळ (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील लालवाडी गावात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी हेब्बाळ येथील ग्राम पंचायतीच्या कार्यालयावर घागरी मोर्चा काढला. खानापूर-यल्लापूर राज्य मार्गालगत सुमारे 600 लोक वस्तीचे लालवाडी गाव आहे. या गावात दोन कूपनलिका व लघु पाणी नळ योजनेद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. परंतु काही दिवसापासून पाणी योजनेची मोटर नादुऊस्त झाल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. यापूर्वी ग्राम पंचायतीकडे पाण्याची समस्या सोडवावी म्हणून अर्ज देण्यात आला होता. परंतु त्याची दखल अद्याप न घेतल्याने बुधवारी महिलांनी ग्राम पंचायतीवर घागरी मोर्चा काढला व आपला संताप व्यक्त केला. ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणपती पाटील यांनी गुरुवारपासून पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिवाय या गावाला लवकरच जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.