सफाई कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेचे अधिकारी ईश्वर उळळागड्डी यांनी तातडीने भेट दिली व समस्या जाणून घेतल्या मात्र, सफाई कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही कचरा उचलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेची चांगलीच गोची झाली आहे.
यावेळी सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, विजय नीर गट्टी यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.